नवी दिल्ली – महाराष्ट्रामध्ये सध्या विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने त्यांचा आघाडीचा निर्णय जाहिर केला आहे, मात्र, शिवसेना आणि भाजपमध्ये युतीचा निर्णय अजून बाकी आहे. आता यासंदर्भातच शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी वक्तव्य केले आहे. ते म्हणाले की ‘दोन्ही पक्षांमधील जागावाटपाचा विषय हा भारत-पाकिस्तानच्या फाळणीपेक्षाही भयंकर आहे’.
Sanjay Raut, Shiv Sena: Itna bada Maharashtra hai, ye jo 288 seats ka bantwara hai ye Bharat-Pakistan ke bantware se bhi bhayankar hai. Had we sat in Opposition instead of being in govt the picture today would have been different. Whatever we decide on seats we’ll let you know. pic.twitter.com/IM4I9Pu1MA
— ANI (@ANI) September 24, 2019
राऊत पुढे म्हणाले की “महाराष्ट्र एवढा मोठा आहे, २८८ जागांचे जे वाटप दोन्ही पक्षांमध्ये होणार आहे, ते भारत-पाकिस्तानच्या फाळणीपेक्षाही भयंकर आहे. जर आम्ही सरकारमध्ये नसतो, आणि विरोधी पक्षात असतो तर परिस्थिती वेगळी असती. या जागावाटप संदर्भात जो निर्णय होईल, तो लगेच माध्यमांना सांगण्यात येईल”, असे राऊत यांनी सांगितले.
आज यासंदर्भात मुंबईमध्ये दोन्ही पक्षांची संयुक्त पत्रकार परिषद होणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार शिवसेनेला १३० जागा हव्या आहेत, तर रिपाई प्रमुख रामदास आठवलेंना १० जागा हव्या आहेत.