मॅंचेस्टर – भारताच्या आघाडीच्या फळीतले 3 फलंदाज केवळ एक धाव काढून माघारी परतले. पहिले 3 फलंदाज माघारी परतल्यानंतर धोनीने मैदानात येणे गरजेचे होते. मात्र, धोनी ऐवजी दिनेश कार्तिक मैदानात आल्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीनेही या निर्णयाबद्दल आश्चर्य व्यक्त केले होते. समालोचना दरम्यान गांगुलीने भारतीय संघ व्यवस्थापनाच्या या निर्णयावर टीका केली.
3 विकेट गेल्यानंतर धोनीला संधी न मिळणे अपेक्षित आहे. ही गोष्ट खरच अनाकलनीय आहे. ज्या क्षणी भारताला धोनीची गरज आहे, त्यावेळी तो मैदानात नाहीये. ही गोष्ट अत्यंत चुकीची आहे. या क्षणी भारताला धोनीच्या अनुभवाची गरज होती. जेव्हा तुमचे पहिले 3-4 फलंदाज 25 धावांच्या आत माघारी परततात, त्यावेळी तुमचा अनुभवी फलंदाज मैदानात येणे अपेक्षित असते.