औरंगाबाद: औरंगाबाद जिल्ह्यातील करमाड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चारा छावणीला चंद्रकांत पाटलांनी भेट देऊन पाहाणी केली. तसेच शेतकऱ्यांशी संवाध साधला. यावेळी विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. दरम्यान, शासनाच्या वतीने दुष्काळी भागात देण्यात येणाऱ्या सुविधांच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यात आला.
राज्यात मराठवाडा दुष्काळाच्या तीव्र झळा सोसत आहे. विरोधकांनी सुद्धा हा मुद्दा उपस्थित करत सरकारवर ताशेरे ओढले आहेत. “महाराष्ट्रात पुरेशा चारा छावण्या उपलब्ध नसल्याने बळीराजा हवालदिल झालाय. चारा-पाण्या अभावी जनावरांचे, जनतेचे हाल होत आहेत. अशा या भीषण परिस्थितीत एकीकडे राष्ट्रवादीचे नेते दुष्काळी भागात फिरून, मदत म्हणून पाण्याचे टॅंकर्स पुरवण्याचं काम करत आहेत, तर दुसरीकडे सत्ताधारी मात्र, मोठमोठ्या लग्न सोहळ्यात आणि कार्यक्रमात व्यस्त आहेत”, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसने केली होती.
Maharashtra Minister Chandrakant Patil visits drought affected areas in Aurangabad. pic.twitter.com/vUtJpiyAnz
— ANI (@ANI) June 2, 2019