Devendra Fadnavis| बारामती लोकसभेसाठी आज सुनेत्रा पवार उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यापूर्वी पुण्यात महायुतीकडून जाहीर सभा घेण्यात आली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील हजेरी लावली होती. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी बारामतीत इतिहास घडणार आहे. आपल्या सुनबाई दिल्लीला जातील म्हणजे जातील, असा विश्वास व्यक्त केला आहे. सध्या त्यांच्या या विधानाची चांगलीच चर्चा रंगली आहे.
नेमकं काय म्हणाले देवेंद्र फडणवीस? Devendra Fadnavis|
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “बारामतीकरांच्या मनामनामध्ये सुनबाई सुनेत्रा पवार आहेत. बारामतीचा फैसला आजच्या सभेनेच केला आहे. बारामतीला आणि वहिनींना कुणीच थांबवू शकत नाही. नवीन इतिहास घडेल आणि सुनबाई दिल्लीला जातील. अजित पवारांनी बारामतीसाठी मेहनत घेतली आहे. बारामतीच्या विकासात त्यांचा मोलाचा वाटा आहे. अजित पवारांनी मागील 25 वर्ष बारामतीचा विकास केला. त्यासाठी भरपूर मेहनत घेतली.”
“आज बारामतीचं जे रुप आहे ते अजित पवारांमुळे आहे, हे कोणीही नाकारु शकत नाही. ही निवडणूक पवार विरुद्ध पवार किंवा सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे अशी ही लढाई नाही आहे. ही लढाई देशाचा नेता निवडण्याची लढाई आहे. देशाचा नेता कोण होईल आणि कोणाच्या हाती देश देऊ, हे ठरवणारी ही निवडणूक आहे.”
पुढे ते म्हणाले, “घड्याळ, धनुष्यबाण किंवा कमळ कोणालाही मत द्या. ते मत नरेंद्र मोदींना जातं आणि दुसरं कोणतंही मत राहुल गांधींना जातं. त्यामुळे मत कोणाला द्यायचं आहे. हा सर्वस्वी निर्णय बारामतीकरांचा असणार आहे. विकासाला मत द्यायचं की विनाशाला मत द्यायचं, हा निर्णय आता तुमचा आहे. यंदाच्या 400 पारमध्ये बारामतीचा लोकप्रतिनिधी पाठवला तर मोदींना मोठी मदत मिळेल म्हणून सुनेत्रा पवारांना मतदान केलं पाहिजे,” असे आवाहनही फडणविसांनी केले.
सुनेत्रा पवार काय म्हणाल्या? Devendra Fadnavis|
मोदींविषयी सर्वांना विश्वास असून मोठ्या वेगाने विकास होत आहे. त्यामूळे जनतेच्या मनात मोदीच आहेत. अजितदादा यांच्यामुळे बारामतीचा विकास झाला. गेल्या १० वर्षात विकास कामे केली आहेत. अनेक विकास काम केली आणि करण्याचा प्रयत्न केला. आजपर्यंत जे घेतलं ते यशस्वी करून दाखवलं आहे. घड्याळाला मत म्हणजे मोदींना मत यावर जनता विश्वास ठेवेल. वेळ बदलली असली तरी चिन्ह तेच आहे, ” असे म्हणत सुनेत्रा पवार यांनी जनतेला निवडून देण्याचे आवाहन केले.
हेही वाचा: