Sangli Loksabha Election 2024| आगामी लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. मात्र अद्याप महाविकास आघाडीतील जागा वाटपाचा तिढा सुटलेला नाही. यातच ठाकरे गटाकडून सांगलीच्या लोकसभा जागेवर दावा केला जात आहे. यामुळे येथील जागेवरून काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये संघर्ष सुरु असल्याचे दिसत आहे. यातच आता काँग्रेसचे नेते आमदार डॉ. विश्वजित कदम यांनी ठाकरे गटाला कडक शब्दांत इशारा दिला आहे. ‘उगाच हट्ट करु नका,
अन्यथा, आम्हाला टोकाची भूमिका घ्यावी लागेल, असे विश्वजित कदम यांनी म्हंटले आहे.
काय म्हणाले विश्वजित कदम ? Sangli Loksabha Election 2024|
“देशाच्या स्वातंत्र्यापासून सांगली जिल्हा, सांगली लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला राहिला आहे. म्हणून या काँग्रेसच्या विचारधारेवर विश्वास ठेवणाऱ्या लोकांच्या जिल्ह्यामध्ये हा मतदारसंघ काँग्रेस पक्षाकडेच राहिला पाहिजे. देशात जातीयवादी शक्तींना रोखण्यासाठी मविआ लोकसभेची निवडणूक लढतेय याच आनंद आहे. सांगलीच्या जागेवर मविआमधील घटक पक्षाने अधिकार सांगण्याच कारण नाही. हा मतदारसंघ काँग्रेसकडेच राहणार आहे,” असं विश्वजीत कदम म्हणाले.
“सांगली लोकसभा मतदारसंघ मागण्याची शिवसेनेची भूमिका चुकीची आहे. सांगली काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. ठाकरे गटाने हट्ट करु नये. सांगलीत 600 गाव आहेत. ठाकरे गटाचे 10 टक्के ग्रामपंचायतीत तरी लोकनियुक्त सरपंच आहेत का?” असा सवाल विश्वजीत कदम यांनी केला.
“चंद्रहार पाटील डबल महाराष्ट्र केसरी आहेत. पैलवान म्हणून प्रसिद्ध आहेत. पण राजकारण, समाजकारण करताना विचारधारेच पाठबळ लागत. सांगलीत दृष्काळाचा प्रश्न आहे. प्रश्न सोडवण्याची भूमिका सातत्याने ठेवावी लागते. चंद्रहार पाटील यांनी सहा ते सात दिवसांपूर्वी ठाकरे गटात प्रवेश केला. त्यांच्या उमेदवारीची चर्चा आहे.,” असेही विश्वजीत कदम म्हणाले.
सांगली लढण्यास व जिंकण्यास काँग्रेस सक्षम Sangli Loksabha Election 2024|
डॉ. विश्वजित कदम यांनी संजय राऊत यांच्यावर देखील नाराजी व्यक्त केली. “खासदार संजय राऊत हे शिवसेना नेते आहेत. महाविकास आघाडीची भूमिका ते व्यक्तीगत सांगू शकत नाहीत. ते शिवसेनेबाबत बोलू शकतात. महाविकास आघाडीत तीन पक्ष आहेत. त्यांच्यावतीने अधिकृत वक्तव्य झाले पाहिजे. कोणत्याही पक्षाने व्यक्तीगत टिप्पणी करू नये. सांगली लढण्यास व जिंकण्यास काँग्रेस सक्षम आहे.”
“सांगलीबाबत आमचा निर्णय झाला आहे. आम्ही जागा लढतोय. तसे राष्ट्रीय व प्रदेश नेत्यांना सांगितले आहे. सांगलीच्या लोकभावना जोपासण्यासाठी जागा काँग्रेसकडे राहील. महाविकास आघाडीत काँग्रेस, शरद पवार आणि ठाकरे गट असे तीन पक्ष आहेत. व्यक्तीगत भूमिका मांडा. पण कोणी एकानेच मविआची भूमिका सांगू नये”, असे कदम यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा :
सेना – भाजपात पक्षांतर्गत मतभेद आले चव्हाट्यावर ?