Pankaja Munde । आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राज्यातील अनेक जण इच्छुक असल्याच्या चर्चा सध्या सुरु आहेत. त्यातच सर्वात चर्चेचे नाव म्हणजे बीडच्या भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचं. मागच्या अनेक वर्षांपासून त्या महत्वाच्या पदावर दिसून आल्या नाहीत. त्यात आता लोकसभेचे तिकीट त्यांना मिळणार असल्याच्या चर्चांना उधाण येतंय, त्याच पार्श्वभूमीवर आता पंकजा मुंडे यांचे एक वाक्य खूप काही सांगून जात असल्याचं दिसतंय.
बीडमधील सभेत पकंजा मुंडे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसमोर बोलताना एका सूचक वक्तव्य केले आहे. यावेळी बोलताना त्यांनी,” 5 वर्षांचा वनवास खूप झाला, आता वनवास नको, असे म्हटले आहे. तसेच माझ्या समर्थकांपुढे कोणंतही पद मला मोठं नाही, असंदेखील पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.
मग तुम्ही सगळे आहात ना माझ्यासोबत ? Pankaja Munde ।
एवढे दिवस वनवास भोगला आहे. बापरे, वनवास म्हटलं की पाचचं वर्षांचा असावा या युगात बाबा ! त्या जुन्या काळात होता वनवास 14 वर्षांचा, आम्हाला 5 वर्षंच खूप झाला. का अजून पाहिजे तुम्हाला ? मग तुम्ही सगळे आहात ना माझ्यासोबत ? असा सवाल यावेळी त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना विचारला.
पुढे बोलताना त्यांनी ,”मला माहीत नाही ईश्वराने माझ्या भाग्यात काय लिहीलं आहे. आत्तापर्यंत जे काही लिहीलं होतं, त्याच्यात तुमच्या प्रेमाव्यतिरिक्त फार काही मिळालेलं नाही. माझ्या जीवनाबद्दल मी फार काही बोलत नाही. पण मी फार दु:ख, यातना, वेदना, भोगून झालेल्या आहेत. ते सर्व भोगूनही मी चेहऱ्यावर हास्य ठेवते, नको असतानाही चेहरा हसरा ठेवते ते केवळ तुमच्यामुळे (कार्यकर्त्यांमुळे).. तुम्ही नाही तर मला आयुष्यात काही नाही.”
तर तो माझ्या जीवनातला शेवटचा दिवस असेल…
त्यासोबतच “खड्ड्यात गेलं ते पद-बिद… मला त्याच्याशी काही घेणं-देणं नाही. पण तुमचं प्रेम हे माझ्यासाठी महत्वाचं आहे. तुम्हाला चांगला विकास देऊन, सन्मार्ग देऊन, त्या प्रेमाची मी पावती देणार आहे, त्याची परतफेड मी करणार आहे. माझ्याकडून तुम्हाला मान खाली घालावे लागेल असं मी काहीही कृत्य करणार नाही. असे झाले तर तो माझ्या जीवनातला शेवटचा दिवस असेल, असेही पंकजा मुंडे म्हणाल्या.