Mamata Banerjee| येत्या काही दिवसांत लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता आहे. यासाठी सर्व राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. याशिवाय विविध घोषणा देखील केल्या जात आहे. यातच आता पश्चिम बंगाल सरकारने लोकसभा निवडणुकीपूर्वी मोठा निर्णय घेतला आहे.
पश्चिम बंगालमध्ये पहिल्यांदाच रामनवमीला सार्वजनिक सुट्टीची घोषणा करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसापूर्वी पश्चिम बंगालमध्ये रामनवमीच्या काळात हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत. या हिंसक घटनांसाठी भाजपने थेट ममता बॅनर्जी यांच्या सरकारला जबाबदार धरले होते.
त्यानंतर पश्चिम बंगाल सरकारने केलेल्या या घोषणेवर भाजपने जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय म्हणाले, “ममता बॅनर्जी यांना जय श्री राम ऐकूनच राग येतो. त्यांनी पश्चिम बंगालमध्ये रामनवमीला सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. आपली हिंदू विरोधी प्रतिमा बदलण्यासाठी त्यांनी हा निर्णय घेतला आहे. पण, आता खूप उशीर झाला आहे. तरी, रामनवमीच्या यात्रेवर दगडफेक होणार नाही याची काळजी घ्यावी. दगडफेक होणार नाही याची काळजी घेतली जाईल का? जय श्री राम!”, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
Mamata Banerjee, who would turn blue with rage, every time she heard ‘Jai Shree Ram’, has designated Ram Navami (17th Apr) as public holiday, in West Bengal. She has done this to redeem her anti-Hindu image. Too late though…
More importantly, she needs to ensure no stones are… pic.twitter.com/yOIIk9jS8z
— Amit Malviya (मोदी का परिवार) (@amitmalviya) March 9, 2024
दरम्यान, तृणमूल काँग्रेस आज रविवारी कोलकाता येथील प्रसिद्ध ब्रिगेड परेड ग्राउंडवर मोठी रॅली काढणार आहे. या रॅलीला ‘जन गर्जन सभा’ असे नाव देण्यात आले आहे. ममता बॅनर्जी या प्लॅटफॉर्मचा वापर करून आगामी निवडणुकांचा अजेंडा ठरवू शकतात.
याशिवाय अनेक सर्व्हेमध्ये भाजपला जास्तीच्या जागा मिळण्याची शक्यता असल्याचे समोर येत आहे. यातच राम मंदिराच्या उद्घाटनामुळे भाजपला मोठा फायदा होण्याची देखील शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जी यांनी घेतलेल्या निर्णयामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
हेही वाचा :
आरोपीकडून मुद्देमाल परत मिळवून द्या; व्यापाऱ्यांची अपर पोलीस अधीक्षकांकडे मागणी