Supriya Sule on Ajit Pawar। राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्ष आणि चिन्ह दोन्ही निवडणूक आयोगाने अजित पवार गटाला दिले. त्यानंतर नवीन नावाने आपण पुन्हा उभे राहू आणि लढू असे शरद पवार यांनी म्हटले. दरम्यान,याच मुद्दयावर खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांना स्वतःच्या वडिलांना कोणी घराबाहेर काढत का ? असा सवाल केला आहे.
बारामती दौऱ्यावर असताना खासदार सुप्रिया सुळे यांनी विविध विषयांवर चर्चा केली. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाकडे गेले यावर भाष्य केले “राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शरद पवारांनी स्थापन केला. तो पक्ष घेतला. तसंच उद्धव ठाकरेंच्या वडिलांनी स्थापन केलेला पक्षहीओरबाडला. स्वतःच्या वडिलांना कुणी घराबाहेर काढतं का?” असे म्हणत अजित पवारांचे नाव न घेता टोला लगावला.
आमच्यावर प्रभू श्रीरामाचे संस्कार Supriya Sule on Ajit Pawar।
श्रीराम त्यांच्या वडिलांच्या वचनासाठी १४ वर्षांच्या वनवासाला गेले. आपल्यावर हे मर्यादा पुरुषोत्तम रामाचे संस्कार आहेत. आज ते आपला पक्षही घेऊन गेले आणि चिन्हही घेऊन गेले. आता लोक विचारतात नवं चिन्ह कसं पोहचवणार? चिन्ह आपण पोहचवू काळजी करु नका. आपण नव्याने पक्ष उभा करु, नवीन चिन्ह घेऊन नव्या जोमाने उभे राहू. आमची सगळ्यात मोठी ताकद इमानदारी आहे. ते सगळं घेऊन जातील पण इमानदारी कशी काय नेतील? असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
महाराष्ट्रातल्या लोकप्रतिनिधींमध्ये असंवेदनशीलपणा Supriya Sule on Ajit Pawar।
पुढे सुप्रिया सुळे यांनी,”ट्रिपल इंजिन सरकारने कुठली मर्यादा आज ठेवली आहे? महिलांवरचे अत्याचार, गोळीबार या घटना राजरोसपणे घडत आहेत. गुंडराज महाराष्ट्रात आहे पण आम्ही याविरोधात लढा देतोय. महाराष्ट्रातल्या लोकप्रतिनिधींमध्ये असंवेदनशीलपणा आलाय. सरकार बदलणं हाच या सगळ्यावरचा उपाय आहे” असे म्हटले.