rohit pawar । राष्ट्रवादी काँग्रेस नेते रोहित पवार यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री अजित पवार यांना घेरण्याचा प्रयत्न केला आहे. रोहित पवार म्हणाले,’छत्रपती शिवाजी महाराजांना समर्थ रामदास स्वामी यांनी घडवलं, असं विधान उत्तर प्रदेशचे मुख्यंमत्री योगी आदित्यनाथ यांनी आळंदी येथे केलं. रोहित पवार यांनी या विधानाचा निषेध केला आहे.
रोहित पवार म्हणाले,’छत्रपती शिवाजी महाराजांना राजमाता जिजाऊंऐवजी तिसऱ्याच व्यक्तीने घडवलं, असं कुणी म्हणत असेल तर त्याचा आम्ही निषेध करतो. अजित पवार गट पूर्वी भाजपा विरोधात असताना अशा विधानांचा निषेध करत होता. आज ते भाजपाबरोबर गेले आहेत, त्यामुळे या विधानावर ते आता काय भूमिका घेणार? असा प्रश्न पवार यांनी उपस्थित केला आहे.
हेही वाचा
twinkle khanna । ट्विंकल खन्नाची मजेदार पोस्ट
तत्पूर्वी, योगी आदित्यनाथ यांनी आळंदीत सुरू असलेल्या गीता- भक्ती अमृत महोत्सवाला उपस्थिती लावली. यावेळी आपल्या भाषणात योगी आदित्यनाथ म्हणाले, ‘समर्थ रामदास स्वामी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना घडविले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी संपूर्ण भारतभर चेतना निर्माण केली. त्या कालखंडात औरंगजेबाच्या सत्तेला आव्हान देत असताना त्यांनी औरंगजेबाला इथे मरण्यासाठी सोडलं. तेव्हापासून आजपर्यंत औरंगजेबाला कुणीही विचारत नाही. ही शौर्य आणि पराक्रमाची धरणी आहे, कारण या मातीत पूज्य संतांचे सानिध्य प्राप्त झाले.’ त्यांच्या या विधानावरून विरोधक आता शिंदे सरकारवर टीका करत आहे.
हेही वाचा
Karthik Aryan । कार्तिक आर्यनचा भेटायला आला जबरा फॅन