पुणे – केंद्र शासनाने सुरू केलेल्या या डिजिटल क्रॉप सर्वे या अॅपच्या माध्यमातून ही पिकांची नोंदणी करण्यात येणार आहे. या अॅपचा सध्या राज्यातील १४८ तालुक्यात प्रायोगिक तत्त्वावर वापर सुरू आहे. या अॅपमधून पिकांची नोंदणी समाधानकारक होत आहे. ही बाब लक्षात घेऊन यावर्षीच्या खरीप हंगामापासून देशभरातील सर्वच राज्यात या अॅपचा वापर होणार आहे.
राज्याने गेल्या काही वर्षांपूर्वी राज्यातील पीक पाहणीची नोंद करण्यासाठी ई-पीक पाहणी अॅप सुरू केले होते. हे अॅपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना बांधावर जाऊन पीक पाहणीची नोंद करणे बंधनकारक केले होते. तसर्व उर्वरित पीक पाहणी सहाय्यकांच्या सहकार्याने करण्यात येत होते. त्यामुळे तलाठ्याकडे जाण्याची शेतकऱ्यांंना गरज पडत नाही. ही बाब लक्षात घेऊन राज्य शासनाचे अॅप केंद्र शासनाने ई-पीक पाहणीसाठी स्वीकारले आहे. त्यामध्ये आणखी काही बदल करून त्याची प्रायोगिक तत्त्वावर चाचपणी महाराष्ट्रासह देशातील २५ ते २६ राज्यात सुरू आहे.
राज्यात यंदाच्या खरीप हंगामात केंद्र सरकारच्या सर्वेक्षण निर्देशानुसार प्रत्येक जिल्ह्यातील २ गावे व नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील सर्व गावे अशा ११४ गावांमध्ये डिजिटल क्रॉप सर्वे या केंद्र सरकारच्या एकूण १४८ तालुक्यात केंद्र शासनाच्या अॅपनुसार ई- पीक पाहणी नोंद करण्यात आली. त्यास शेतकर्यांचा उत्तम प्रतिसाद मिळाल्याने केंद्र सरकारने हे अॅप देशभर वापरण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती भूमि अभिलेख विभागाकडून देण्यात आली.