अत्यल्प पावसाचा परिणाम : पेरलेले उगवलेच नाही
समीर भुजबळ
वाल्हे – यावर्षी मान्सूनपूर्व व मान्सून पावसाने पुरंदर तालुक्यात दडी मारल्यानंतरही पुढील काही दिवसांत पाऊस पडेल या आशेवर परिसरातील शेतकर्यांनी रब्बी हंगामातील पिकांची पेरणी केली होती. मात्र, पावसाअभावी पेरलेले काही ठिकाणी उगवले नाही. तर काही शेतकर्यांची उगवलेली पिके पाण्यावाचून कोमेजून गेली. तालुक्यात मागील वर्षी गव्हाचा पेरा 2738 हेक्टर क्षेत्रावर होता तर यंदा फक्त 2576 हेक्टर क्षेत्रात झाला असून असून एकूण 162 हेक्टरने यंदा पेरा घटला आहे.
यावर्षी पुरंदर तालुक्यात मान्सूनपूर्व व मान्सून पाऊस अतिअल्प प्रमाणात पडल्याने, तालुक्यात सर्वत्रच पाणीटंचाई निर्माण झाली आहे. ऑक्टोबर महिन्यांपासूनच उष्णतेत प्रचंड वाढ झाली होती. यामुळे, जमिनीतील ओलावा वेगाने कमी झाला होता. यामुळे शेतातील उभी पिके कोमेजून गेली होती. पुरंदर तालुक्यात चालू वर्षी, खरीप हंगामात पाऊस वेळेवर पडला नाही. त्यामुळे खरीप हंगाम लांबला.
कोरडवाहू पेरणी क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात घट झाली होती. त्यामुळे रब्बी हंगाम जमिनीत कमी ओलावा पेरणी क्षेत्रात घट झाली. पुरंदर तालुक्यातील अनेक गावांत, वाड्या-वस्त्यांवर पावसाळ्या पासूनच टँकर ने पाणीपुरवठा केला जात आहे.
तसेच अनेक गावातील विहिरींची पाणी पातळीही पूर्णपणे खलावली असल्याने, पाण्याअभावी शेतकरी अडचणीत सापडला आहे. गहू पेरणीनंतर तीव्र पाणीटंचाईने अनेक शेतकरीवर्गाचे गहू पिकांची वाढ खुंटली आहे. यामुळे यावर्षी पुरंदर तालुक्यात गव्हाचे उत्पादनात घट होणार आहे.
भीषण दुष्काळाला सामोरे
यावर्षी खरीप हंगामातील पिके काही पिके पाण्याच्या संकटामुळे हातातून गेली होती. रब्बी हंगामाची भिस्त आता मअवकाळीफ पाऊसावर अवलंबून राहीली होती; मात्र तालुक्यात अवकाळीच्या लक्या सरी कोसळल्याने, फळबाग शेतकरीवर्ग संकटात सापडला. अवकाळीच्या सरी जोरदार पडल्या नसल्याने, यावर्षी, पुरंदर तालुक्याला भीषण दुष्काळाला सामोरे जावे लागेत आहे.
यावर्षी पुरंदर तालुक्यात पावसा अभावी पाणीटंचाई निर्माण झाली असल्याने, मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी रब्बी हंगामात गहू पिकांचा पेरा कमी झाला आहे; मात्र, पाण्याअभावी अनेक गावांत गहू पिकांची वाढ खुंटली असून यावर्षी गव्हांच्या उत्पादनात घट होईल.
– अनिल दुरगुडे, मंडल कृषी अधिकारी.