राहाता – आजही भारत देश डॉ. आंबेडकर यांनी दाखवलेल्या दिशेने मार्गक्रमण करीत आहे, त्यांनी जे संविधान लिहिले आहे त्या संविधानाइतका पवित्र ग्रंथ कोणता नाही. भरकटलेली युवा पिढी पुन्हा एकदा जर बाबासाहेबांच्या विचारांकडे आकर्षित करावयाची असेल तर त्यासाठी आंबेडकरी विचारांचे परिसंवाद, संमेलने व प्रबोधनपर व्याख्याने आयोजित करायला हवेत, असे मत डॉ. के. वाय. गाडेकर धन्वंतरी पतसंस्थेचे चेअरमन डॉ. स्वाधीन गाडेकर यांनी व्यक्त केले.
येथील डॉ. के. वाय. गाडेकर धन्वंतरी पतसंस्थेमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त संस्थेचे चेअरमन डॉ. स्वाधीन गाडेकर आणि माजी उपनगराध्यक्ष धनंजय निकाळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये अभिवादन करण्यात आले. यावेळी व्हाइस चेअरमन नानासाहेब बोठे, संचालक ऋषिकेश सदाफळ, सुभाषराव म्हसे, लक्ष्मणराव जेजुरकर, शाखाधिकारी राधाकिसन भुजबळ, रोहन गाडेकर, महेश त्रिभुवन, चेतन खरात, हेमलता कुलकर्णी, प्रियंका मुंगसे, रोहित गाडेकर आदी उपस्थित होते. राधाकिसन भुजबळ यांनी आभार मानले.