राजुरी – लळई मळा रस्त्याची दुरवस्था झाली असून रस्त्याला मोठमोठे खड्डे पडले असल्याने रस्त्यात खड्डा की खड्ड्यांत रस्ता असे म्हणण्याची वेळ आली आहे.
राजुरी (ता. जुन्नर) परिसरात शेतकरी दूध व शेतीमाल या रस्त्यावरून वाहतूक करावी लागते जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माध्यमिक विद्यालयात उच्च शिक्षणासाठी मुलांना याच रस्त्याने वाहतूक करावी लागते त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या विद्यार्थ्यांना या रस्त्याने जाताना मोठी कसरत करावी लागत आहे.
राजुरी गाव ते या मळ्याचे अंतर फक्त दोन ते तीन किलोमीटर आहे; परंतु हे अंतर पार करायला नागरिकांना खड्ड्यांमुळे अर्धा तास लागत आहे. या परिसरातील ग्रामस्थांनी रस्त्याचे काम व्हावे यासाठी वारंवार मागणी केली आहे मात्र ना प्रशासन ऐकत ना राजकीय पदाधिकारी.
गावपुढारी नावालाच?
गावात अनेक गावपुढारी आहेत. त्यांचे आमदार, खासदार तसेच प्रशासनातील अनेक अधिकाऱ्यांच्या ओळखी आहेत; पण हे गावपुढारी फक्त नावालाच असलेले दिसता आहेत. कारण ना यांचे नेते ऐकत ना प्रशासकीय अधिकारी, त्यामुळे केवळ हे गावातच मिरवाला आहेत का, असा सवाल ग्रामस्थांनी केला आहे.
हा रस्ता प्रस्तावित केला आहे पण अजून त्याला मंजुरी मिळाली नाही या रस्त्याचे काम लवकरात लवकर मार्गी लावले जाईल मागील काळात सरकार बदली झाले त्यामुळे या रस्त्याचे काम रखडले पण आता पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार आहेत त्यामुळे रस्त्याचे काम आमदार अतुल बेनके यांच्या माध्यमातून लवकरच मार्गी लावू.
– जयसिंग औटी, उपाध्यक्ष, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस