मुंबई – महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra politics) अनेक स्थित्यंतर पाहायला मिळाली. गटातटाचे राजकारण समोर आले. हेवेदावे प्रतिदावे नेत्यांमध्ये होतच आहेत. अशात दोन जुन्या पक्षांमध्ये गटातटाचे राजकारण सुरु झाले त्याचा परिणाम पक्षविभागणीवर झाला. सध्या महाराष्ट्रातील दोन मोठी घराणी ठाकरे आणि पवार (thackeray pawar family) आपापल्या पक्षातील गटबाजीमधील दुरावे दूर करण्याचा प्रयत्न करत आहे. ज्या पक्षामध्ये निवडणूक लढविली त्याच पेक्षासाठी संघर्ष करावा लागतोय ही सर्व स्थिती कार्यकर्त्यांच्या समजण्याच्या पलीकडे आहे.असे असताना राज्यासह देशात सत्तेवर असलेल्या भाजपाला ठाकरे गटाने मुंबईत जोरदार धक्का दिला आहे. नुकताच भाजपच्या (Mumbai Bjp) एका नेत्याने ठाकरे गटात प्रवेश केला.
आगामी काळात होणाऱ्या लोकसभेच्या,विधानसभेच्या आणि महानगर पालिकेच्या निवडणुका लक्षात घेता सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. आज उत्तर-मध्य मुंबईतील भाजपाचे सचिव सुधीर खातू यांनी ठाकरे गटात प्रवेश केला आहे. उद्धव ठाकरे (Uddhav thackeray) यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर हा प्रवेश पार पडला.
आज उत्तर मध्य मुंबई लोकसभेतील ॲड. सुधीर खातू ह्यांनी त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांसमवेत पक्षात प्रवेश केला. ह्यावेळी पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांनी शिवबंधन बांधून त्यांचे स्वागत केले. pic.twitter.com/gCBNdm4zoo
— ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) October 8, 2023
मातोश्रीवर पार पडलेल्या या पक्ष प्रवेशानंतर उद्धव ठाकरे यांनी खातू यांचे कौतुक केले.आगामी महापालिकेची निवडणूक लक्षात घेता ठाकरे गटाने पक्ष बांधणी सुरु केली आहे. पक्ष प्रवेशानंतर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले,”राजकारणात साधारणत: पक्षप्रवेशाचा जो प्रवाह असतो, तो विरोधीपक्षाकडून सत्ताधारी पक्षाकडे असतो. पण सुधीर खातू यांनी हा प्रवाह उलटा फिरवला आहे. ते सत्ताधारी पक्षातून विरोधी पक्षात आले, असं मी म्हणणार नाही. त्यांनी सत्ताधारी पक्षातून देशप्रेमी आणि हिंदुत्ववादी पक्षाकडे (ठाकरे गट) प्रवाह सुरू केला”
“आताच नाही तर कधीच नाही. आताच आपण हुकूमशाहीची वळवळ गाडली नाही, तर आपल्या भगव्याला काही अर्थ राहणार नाही. आपल्या देशप्रेमाला काही अर्थ राहणार नाही” असंही ठाकरे यावेळी म्हणाले.