कोलंबो :- आशिया करंडक स्पर्धेचे साखळी सामने संपून बुधवारपासून सुपर-4 सामन्यांना सुरुवात झाली. सुपर-4 स्पर्धेतील पहिला सामना पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात खेळला गेला.
या स्पर्धेचा अंतिम सामना 17 सप्टेंबरला होणार आहे. आशिया करंडक सुपर 4 फेरीत एकूण 6 सामने खेळवले जाणार आहेत. त्यातील केवळ एकच सामना पाकिस्तानमध्ये खेळवला जाणार असून उर्वरित 5 सामने श्रीलंकेत खेळवले जाणार आहेत. सुपर 4 फेरीचा अखेरचा सामना 15 सप्टेंबरला होणार आहे.
सुपर 4 गटातील उर्वरीत सामन्यांचे वेळापत्रक:-
(सर्व सामने भारतीय प्रमाणवेळेनूसार दुपारी 3 वाजल्यापासून)
9 सप्टेंबर – श्रीलंका विरुद्ध बांगलादेश – कोलंबो
10 सप्टेंबर – भारत विरुद्ध पाकिस्तान – कोलंबो
12 सप्टेंबर – भारत विरुद्ध श्रीलंका – कोलंबो
14 सप्टेंबर – पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका – कोलंबो
15 सप्टेंबर : भारत विरुद्ध बांगलादेश – कोलंबो
17 सप्टेंबर – अंतिम सामना – कोलंबो
दरम्यान, भारताचे सुपर 4 मध्ये तीन सामने होतील. भारताला जर सुपर 4 मधून अंतिम फेरी पोहोचायचे असेल तर त्यांना तीनपैकी दोन सामने हे जिंकावेच लागतील.त्याचबरोबर या सुपर 4 मध्ये कोणत्या संघाला रन रेट किती आहे, हे पाहणे महत्वाचे असेल.