मुंबई – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड करत भाजप सोबत हातमिळवणी केली. यानंतर शिंदे यांनी शिवसेनेतील ४० आमदारांना एकत्र घेत भाजप सोबत सत्तास्थापन केली. यावेळी अनेक आमदारांनी मंत्रीपद सोडत शिंदे यांच्यासोबत आले. यातील अनेक आमदारांना मंत्रीपदावर पाणी सोडून आले होते. त्यामुळे त्यांना या नव्या सरकारमध्ये मंत्रिपद मिळणार असल्याची इच्छा होती, मात्र मंत्री मंडळ विस्तार होत नसल्यामुळे आणि अजित पवार यांच्या शपथ विधीमुळे शिंदे गटातील मंत्री नाराज असल्याची चर्चा गेल्या कित्येक दिवसांपासून सुरु असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
अशात शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी केलेले विधान चांगलेच चर्चेत आले आहे. गोगावले माध्यमांशी बोलतांना म्हणाले की, ‘एकनाथ शिंदे एकट्याच्या जीवावर मुख्यमंत्री झाले नाहीत. आमच्यासारखे शिलेदार ताठ मानेने त्यांच्या मागे उभे राहिले. म्हणून शिंदे मुख्यमंत्री होऊ शकले. असं भरत गोगावले म्हणाले. त्यांचे हे वक्तव्य चर्चेत आले आहे. यावरून आता विरोधी पक्षातील नेत्यांनीही प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे.