मुंबई – पक्ष बांधणी आणि विस्तार या विषयावर राज ठाकरेंनी न बोलेले बरे, असा शब्दांत भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला.
भाजपने पक्ष फोडण्याऐवजी पक्ष बांधावा, अशी टीका राज ठाकरेंनी भाजपवर केली. राज ठाकरेंच्या टीकेला आशिष शेलार प्रत्युत्तर देत म्हणाले, राज ठाकरेंना मी बोलले तर फार लागते. यामुळे पक्ष बांधणी आणि विस्तार या विषयावर राज ठाकरेंनी न बोलेले बरे. तसेच बंदुक कान पट्टीवर ठेवणे, हल्ली राज ठाकरे जास्त हिंदी चित्रपट बघत असतील. म्हणून ते तसे बोलले असतील, असा टोला लागावला.
दुसरीकडे शरद पवार हे भाजपमध्ये आले तरच अजित पवार मुख्यमंत्री होईल, असा दावा विजय वडेट्टीवारांनी केला, यावर आशिष शेलार म्हणाले, बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना, असे विजय वडेट्टीवार यांचे वक्तव्य आहे. ते कॉंग्रेसचे नेते, शरद पवार राष्ट्रवादीचे नेते आणि सरकार भाजपचे. शरद पवारांना भाजप ऑफर दिल्याची भूमिका भाजप मांडत आहे. याचा काय संबंध आहे? दोन चिंच लावल्यावर किती काकड्या येणार, हे विचारणारे वक्तव्य म्हणजे विजय वडेट्टीवारचे आहे,अशी बोचरी टीका त्यांनी वडेट्टीवारांवर केली.
युटन म्हणजे ‘उद्धव’ टर्न
उद्धव ठाकरे मातोश्रीमधून लोकसभेच्या 48 मतदारसंघाचा आढावा घेत आहे, पत्रकारांच्या प्रश्नावर आशिष शेलार म्हणाले, मुळात उद्धव ठाकरे जे बोलतात ते करतात का?, हाच पहिला प्रश्न आहे. आज काल महाराष्ट्राच्या राजकारणता यू टर्न म्हणजे उद्धव टर्न अशा पद्धतीचा समज आहे. यामुळे 48 मतदारसंघाबाती काय करतील याबद्दल मला कल्पना नाही. पण 0+0 असतो, असे म्हणत उद्धव ठाकरेंवर टीका केली.