राजस्थानच्या टोंक जिल्ह्यात एका व्यक्तीने दोन सख्ख्या बहिणींशी एकाच दिवशी एकाच मंडपात विवाह केला आहे. या लग्नात गावातील आणि त्यांच्या समाजातील लोकही सहभागी झाले होते. आता या लग्नाची सर्वत्र चर्चा होत आहे, तुमच्याही मनात हा प्रश्न नक्कीच पडत असेल की, दोन मुलींशी विवाह का केला?
हरिओम मीना असे नवरदेवाचे नाव असून तो उच्चशिक्षित आहे. तो स्पर्धा परीक्षेची तयारी करतो. त्याचे बाबूलाल मीणा यांची मोठी मुलगी कांता हिच्याशी प्रेमसंबंध होते. त्याने ही माहिती घरच्यांना सांगितली. दोघांच्याही घरच्या मंडळींनी या दोघांच्या लग्नाला होकार दिला. कांता ही देखील उच्चशिक्षित असून तीने बीएड केलेले आहे.
मात्र कांती हिने हरिओमसमोर लग्न करण्यासाठी एक अट ठेवली. कांता हिची लहान बहिण मानसिकदृष्ट्या कमकुवत आहे. त्या दोघीही लहानपणापासून एकमेकींसोबतच राहिल्या. कांताला लहान बहिणीची खुप काळजी वाटते. त्यामुळे तीने हरिओमसमोर अट ठेवली की, आमच्या दोघींशी विवाह करावा लागेल. हरिओमच्या घरच्या मंडळींनी सुरूवातीला या लग्नाला नकार दिला. मात्र हरिओमच्या हट्टापुढे त्यांचे काही चालले नाही आणि त्यांचा विवाह मोठ्या थाटामाटत पार पडला.
दरम्यान, या निर्णयावरून अगोदर हरिओमची खिल्ली उडवली जावू लागली मात्र त्याने एका मानसिकदृष्ट्या कमकुवत मुलीशी लग्न करून दोघी बहिणींना आयुष्यभर सोबत ठेवण्याचा निर्णय घेतला. त्याच्या या कामगिरीमुळे त्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.