मुंबई – महाराष्ट्र सरकारमार्फत देण्यात येणारा 2022 चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार ज्येष्ठ निरूपणकार तथा समाजसेवक आप्पासाहेब धर्माधिकारी यांना जाहीर झाला आहे. आज 16 एप्रिल रोजी डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रधान केला गेला. नवी मुंबईतील खारघर येथील आंतरराष्ट्रीय कॉर्पोरेट मैदानावर हा सोहळा पार पडणार आहे. या कार्यक्रमाची जोरदार तयारी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी लोकांनी देखील प्रचंड गर्दी केली आहे.
या सभेत सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार मोठी घोषणा केली. भाषणादरम्यान ते म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे आणि जगदंब तलवार महाराष्ट्राच्या मातीत दर्शनासाठी येणार आहेत. त्याबाबतची घोषणा मुनगंटीवार यांनी केली. सुधीर मुनगंटीवार म्हणाले, ‘अफझल खानचे उदात्तीकरण करण्यासाठी अतिक्रमण करण्यात आलं होतं. १९५३ पासून कोणतंच सरकार अतिक्रमण हटवत नव्हतं. पंरतु, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारने हे अतिक्रमण हटवून तेथे ‘जय भवानी जय शिवाजी’चा जयघोष करण्याचा आपल्याला भाग्य दिले”, असं मुनगंटीवार म्हणाले.
सुधीर मुनगंटीवार पुढे म्हणाले की, “हॅलो नाही, वंदे मातरम् हे मी अमित शाहांच्या कार्यालयातून शिकलो. तुमच्या कार्यालयात केव्हाही फोन केला तर हॅलो एवजी वंदे मातरम् म्हटलं जातं. आज मी मोठ्या अभिमानाने सांगतो की रायगडची भूमी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा ३५० वा राज्यभिषेक मोठ्या धामधुमीत येथे साजरा करणार आहेत. यापेक्षाही मोठी बाब अशी आहे की काल, ब्रिटिश काऊंन्सिलेटशी आमची चर्चा झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं आणि जगदंब तलवार महाराष्ट्रातील जनतेसाठी दर्शनाकरता उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.” असेही ते म्हणाले आहे.