मुंबई : शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) ही बॉलिवूडमधील त्या प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे, जी आपल्या सौंदर्य आणि फिटनेसमुळे वयाच्या 47 व्या वर्षीही इंडस्ट्रीत कायम चर्चेत आहे. आजही या अभिनेत्रीचे लाखो चाहते आहेत. शिल्पा शेट्टीने आपल्या अभिनय आणि सौंदर्यामुळे बॉलिवूडवर दीर्घकाळ राज्य केले आहे. शिल्पा सध्या चित्रपटांपासून दूर असली तरी एकेकाळी ती चित्रपटसृष्टीत सर्वाधिक डिमांड असलेली अभिनेत्री होती.
शिल्पा एकेकाळी तिच्या चित्रपटांमुळे तसेच अक्षय कुमारसोबतच्या (Akshay Kumar) नात्यामुळे चर्चेत होती. दोघांनीही बराच काळ एकमेकांना डेट केले होते, पण नंतर दोघांचे ब्रेकअप झाले. अक्षय कुमारसोबतच्या ब्रेकअपचे कारण खुद्द शिल्पा शेट्टीनेच उघड केले आहे.
अक्षय कुमार पत्नी ट्विंकल खन्नासोबत आनंदी आहे. फॅमिली मॅन आहे. पण एकेकाळी लव्हर बॉय अशीच त्याची इमेज होती. लग्नाआधी अक्षय कुमारचे नाव अनेक अभिनेत्रींशी जोडले गेले. शिल्पा शेट्टी, रवीना टंडन या दोघींबद्दल तुम्हाला ठाऊक असेलच. पण त्याच्या गर्लफ्रेन्डच्या यादीत याशिवायही अनेक नावे होती. अनेकींसोबत अक्षयच्या अफेअरच्या चर्चा गाजल्या. अक्षय कुमारबरोबर त्याकाळी शिल्पाचे अफेअर होते. दोघेही बराच काळ एकमेकांना डेट करत होते. मात्र, नंतर दोघांचे मार्ग वेगळे झाले.
शिल्पा एकेकाळी अक्षयच्या प्रेमात पडली होती, शिल्पाचे अक्षय कुमारवर खूप प्रेम होते, पण जेव्हा तिला कळले की अक्षय तिची फसवणूक करत आहे तेव्हा ती पूर्णपणे कोलमडली. साल 2000 मध्ये शिल्पा शेट्टीने फिल्मफेअरला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये तिच्या ब्रेकअपबद्दल खुलासा केला होता.
त्यावेळी शिल्पा शेट्टीने अक्षयसोबतचे आपले संबंध उघड केले होते. तिने सांगितले की, अक्षय जेव्हा तिच्यासोबत रिलेशनशिपमध्ये होता तेव्हा तो ट्विंकल खन्नालाही डेट करत होता. म्हणजेच एकाचवेळी दोघींसोबत नात्यात होता. जेव्हा तिला या अफेअरची माहिती मिळाली तेव्हा तिला धक्काच बसला.
शिल्पाने सांगितले होते की, “माझ्यासाठी हा खूप वाईट काळ होता. पण मी त्यावर मात केली याचा मला आनंद आहे. काळोख्या रात्रीनंतर सकाळ येते. माझ्यासाठी व्यावसायिकदृष्ट्या सर्व काही ठीक चालले होते, पण माझ्या वैयक्तिक आयुष्यात अनेक चढ-उतार आले. पण, आता सगळं मागे पडल्यासारखं वाटतंय.
शिल्पाने मुलाखतीदरम्यान अक्षयबद्दल आणखी एक खुलासा केला. तिने सांगितले की, आपल्या गर्लफ्रेन्डचा विश्वास जिंकण्यासाठी तसेच तिची समजूत काढण्यासाठी, मन वळवण्यासाठी तो नेहमी एकच गोष्ट करायचा. ती म्हणजे तिला मंदिरात घेऊन जायचा. शिल्पाने मुलाखतीत सांगितले होते की, अक्षय कुमार त्याच्या प्रत्येक मैत्रिणीचा विश्वास जिंकायचा. यासाठी तो तिला रात्री उशीरा सिद्धिविनायक मंदिरात न्यायचा आणि तिला लग्न करण्याचे वचन द्यायचा. पण हे तेवढ्यापुरते. पण त्याच्या आयुष्यात नवीन मुलगी येताच त्याला या वचनाचा विसर पडायचा.”
दरम्यान, शिल्पा आणि अक्षयची पहिली भेट 1994 मध्ये ‘मैं खिलाडी तू अनाड़ी’च्या सेटवर झाली. 1997 मध्ये ‘जानवर’ सिनेमाच्या चित्रकरणादरम्यान या दोघांमध्ये जवळीक वाढली. ‘धडकन’ सिनेमाच्या शूटिंगच्या वेळी हे दोघे लवकरच लग्न करणार असे बोलले जाऊ लागले होते. अशाच अचानक या लव्हस्टोरीतही नवा ट्वीस्ट आला. अक्षय शिल्पाला सोडून त्याची खास मैत्रिण ट्विंकल खन्नाच्या प्रेमात पडला. जेव्हा शिल्पाला हे समजले तेव्हा तिने खूप गोंधळ घातला होता आणि 2000 मध्ये दोघांचेही ब्रेकअप झालें. ‘धडकन’ चित्रपटानंतर अक्षय कुमार आणि शिल्पाने पुन्हा एकत्र काम केले नाही.
सध्या, शिल्पा आणि अक्षय दोघेही आता त्यांच्या वैवाहिक आयुष्यात खूप आनंदी आहेत. अक्षयने 2001 मध्ये ट्विंकल शी लग्न केले आणि त्यांना दोन मुले आहेत. तर शिल्पा शेट्टीने 2009 मध्ये बिझनेसमन राजकुंद्रासोबत लग्न केले होते. आता ती दोन मुलांची आई आहे आणि यासोबतच ती तिच्या व्यावसायिक जीवनात आणि करिअरमध्येही खूप यशस्वी आहे.