मुंबई – बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर सध्या त्याचा आगामी चित्रपट ‘तू झुठी में मक्कर’च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. प्रमोशनसाठी चित्रपटातील सर्व कलाकार कलाकार विवध कार्यक्रमांमध्ये जाऊन आपल्या चित्रपटाचे प्रमोशन करत आहेत. मात्र रणबीर सोशल मीडियापासून दूर असल्याने सोशल मीडियावर चित्रपटाच्या प्रमोशनची जबाबदारी फक्त श्रद्धा कपूरने घेतली आहे. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याने सोशल मीडियापासून अंतर का ठेवले आहे याचा खुलासा केला आहे.
सोशल मीडियापासून नेहमी स्वत:ला दूर ठेवण्यामागचे कारण सांगताना रणबीर म्हणाला की, आजकाल अभिनेता अभिनेत्री यांच्यातील केमिस्ट्री चांगली होताना दिसत नाही. आम्ही खूप जाहिराती करतो. चित्रपट करतो. प्रमोशन, शो दरम्यान अनेक ठिकाणी दिसतो. अशात प्रेक्षकांना देखील त्याचा कंटाळा येऊ लागतो. मग ते एखाद्या नव्या चेहऱ्याची वाट पाहतात असं रणबीर यावेळी सांगतो.
रणबीर कपूरनेही सोशल मीडियापासून दूर राहण्याचा फायदा सांगितला आहे. तो म्हणाला की मी माझ्या प्रायव्हसीचे शक्य तितके रक्षण करण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून जेव्हाही माझा चित्रपट येतो तेव्हा प्रेक्षकांना वाटते की खूप दिवसांनी याचा चित्रपट येत आहे. चला बघूया आणि ते लोक चित्रपट पाहायला जातात असं रणबीर सांगतो. एकूणच अनेक ठिकाणी वारंवार दिसल्याने प्रेक्षकही कंटाळतात असा सूतोवाच करत रणबीरने सोशल मीडियावर न येण्याचे कारण पटवून दिले आहे.
रणबीर कपूरच्या आगामी ‘तू झुठी मैं मक्कार’ या चित्रपटाविषयी बोलायचे झाले तर, हा चित्रपट होळीच्या मुहूर्तावर म्हणजेच ८ मार्चला चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात रणबीरसोबत श्रद्धा कपूर दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन लव रंजन यांनी केले आहे.