बीड – शिवसेना पक्षातील फुटीनंतर पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी माजी मंत्री आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे राज्यभर मेळावे घेता आहे. शिवसैनिकांशी संवाद साधत आहे. अशात औरंगाबाद दौऱ्यावर असताना आदित्य ठाकरेंच्या गाडीवर हल्ला करण्यात आला. मंगळवारी रात्री उशिरा ही घटना घडली. हा हल्ला शिंदे गटातील आमदारांच्या कार्यकर्त्यांनी केला असल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे.
मात्र सत्ताधारी नेत्यांकडून आदित्य ठाकरेंवर या घटनेचा आरोप केला जात आहे. अशातच नितेश राणे असे म्हणाले की,’ आदित्य ठाकरेंना झेड + सुरक्षा मिळावी या साठी हा हल्ला त्यांनी स्वःताहा घडवून आणला आहे.’
दरम्यान त्यांच्या या आरोपावर पत्रकरांशी आदित्य ठाकरे यांना प्रश्न विचारला असता आदित्य ठाकरे म्हणाले,’ अशांकडे मी लक्षही देत नाही; राणेचं नुसतं नावं काढताच आदित्य ठाकरे पुढे म्हणाले,’शी..शी…अशांकडे मी लक्षही देत नाही’ त्याचप्रमाणे, शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणारच नाही असं विधान आदित्य ठाकरेंनी केलं.