मुंबई – बॉलिवूडचा प्रसिद्ध चित्रपट निर्माता अनुराग कश्यप सध्या त्याच्या ऑल मोस्ट प्यार विथ डीजे मोहाब्बत या चित्रपटामुळे चर्चेत आहे. नुकतच अनुरागने एका वेब शोमध्ये हजेरी लावली. यावेळी त्याने आपल्या खाजगी आयुष्यासह विविध गोष्टींवर भाष्य केले. अनुरागने यावेळी अभिनेता सलमान खान आणि तेरे नाम या चित्रपटाबाबत देखील एक भन्नाट किस्सा सांगितला आहे.
वेगवेगळे विषय घेऊन सिनेमा बनवणारा अनुराग नेहमीच चर्चेत असतो. अभिनेता सलमान खानचा २००३ मध्ये आलेला तेरे नाम सिनेमा चांगलाच हिट झाला होता. वेब शोला दिलेल्या मुलाखतीत अनुराग कश्यपने तेरे नाम बाबतचा एक किस्साच सांगितलं आहे. तेरे नाम या चित्रपट का सोडावा लागला याबाबत देखील अनुरागने यावेळी भाष्य केले आहे.
अनुराग म्हणतो,तेरे नाम लिहिल्यानंतर मला चित्रपटातून काढण्यात आलं कारण मी हिरोला छातीवरील केस न काढता तसेच ठेवण्यासाठी सांगितले होते. त्यावर मुलाखतकार म्हणतो,केस नसते तरी चालले असते ना ? त्यात एवढं काय होत ? तो सलमान खान आहे. त्यावर अनुराग पुन्हा म्हणतो,आग्रा मथुरेतील फिल्म होती त्यामुळे मला ते आवश्यक वाटले.
गँग्ज ऑफ वासेपूर,सेक्रेट गेम्स,ब्लॅक फ्रायडे,देव डी अशा दर्जेदार कलाकृती देणाऱ्या अनुराग कश्यपचा ‘ऑल्मोस्ट प्यार विथ डीजे मोहब्बत’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. त्यानिमित्त अनफिल्टर विथ समदिश या शोमध्ये आपले अनेक कारनामे अनुरागने सांगितले.