मुंबई – यंदाच्या दसरा मेळावा दोन्ही गटांच्या भाषणांनी गाजणार हे नक्की होते आणि झालेही तसेच. ठाकरे आणि शिंदे गटाकडून बऱ्याच प्रमुख नेत्यांनी भाषणे केली. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांचेही भाषण झाले. त्यांनी आपल्या भाषणादरम्यान शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला. उद्धव ठाकरेंनी यावेळी “आता रावण १० तोंडांचा होता. आता ५० खोक्यांचा रावण झाला आहे. हा खोकासूर आहे. काळ बदलतो, तसा रावणही बदलला आहे, अशा शब्दांत जोरदार टीका केली.
“पक्षातून काही लोकांनी गद्दारी केली, होय त्यांना गद्दारच म्हणणार. जे गद्दार आहेत ज्यांनी गद्दारी केली, त्यांना गद्दार नाही म्हणायचं तर मंग काय म्हणायचं. गद्दारीचा शिक्का यांच्या कपाळावरचं लागलाय तो कसा पुसणार? आत्तापर्यंत रावण १० तोंडांचा होता. आता ५० खोक्यांचा रावण झाला आहे. हा खोकासूर आहे. काळ बदलतो, तसा रावणही बदलला आहे.”
“वाईट आणि संतापही एका गोष्टीचा वाटतो, की जेव्हा मी माझ्या शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात होतो, माझी बोटंही हलत नव्हती, शरीर निश्चल पडलं होतं. तेव्हा ज्यांच्यावर मी जबाबदारी दिली होती, ते कटाप्पा.. म्हणजे कट करणारे अप्पा ते कटाप्पा.. ते कट करत होते की हा पुन्हा उभा राहूच शकणार नाही. पण त्यांना कल्पना नाही की हा उद्धव बाळासाहेब ठाकरे आहे”, असेही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.
ज्यांना आपण सगळं काही दिल, आमदारक्या आणि खासदारक्या दिल्या. यांना मंत्री केलं, महत्वाची पद दिली, त्यांनीच गद्दारी केली. मात्र ज्यांना काहीच दिल नाही ते सामान्य शिवसैनिक आजही शिवसेनेसोबत आहेत. हि शिवसेना माझी एकट्याची नाही, तुमच्यासारख्या लाखो सर्वसामान्य शिवसैनिकांची आहे. हा कोण मला पक्षप्रमुख पद सोडण्यास सांगणारा, तुम्ही माझ्या सर्वसामान्य शिवसैनिकानी मला म्हणावं पद सोडा म्हणून, मी आनंदाने इथून घरी जाईल.” असेही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. ( Dasara Melava 2022 Udhdav Thackeray attacks on CM Eknath Shinde Group Shivaji Park )