मुंबई अभिनेत्री मलायका अरोरा जितकी आपल्या फिटनेससाठी ओळखली जाते तितकीच अर्जुन कपूरसोबत असलेल्या मैत्रीमुळे देखील प्रसिद्ध आहे. अनेकदा मलायका आणि अर्जुन सोबत सुट्ट्या घालवतात,फिरायला जाताना दिसून येतात. दोघांनीही अद्याप आपल्या नात्याबद्दल काहीच भाष्य केललं नाही. तरीही सिनेसृष्टीत त्यांना पॉवर कपल म्हणून ओळखलं जात. आता मलायकाने आपल्या लग्नासंबंधी भाष्य केलं आहे. एका मुलाखतीत तीन अर्जुनसोबतच्या मैत्रीबाबत देखील खुलासा केला आहे.
मलायका अरोरा आणि अर्जुनं कपूर यांच्यातील मैत्री काही मीडियापासून लपून राहिलेली नाही. जेव्हा मलायकाला तिच्या लग्नाबद्दल विचारण्यात आले तेव्हा ती म्हणाली,‘लग्न ही आयुष्यात घडणारी सुंदर घटना आहे. मला वाटतं की, कुणीही लग्नासाठी घाई करू नये,जेव्हा माझ्या लग्नाचा प्रश्न येतो, तेव्हा मला असेच वाटते की, मी आत्ताच त्याचे उत्तर देऊ शकणार नाही.’ असं मलायका म्हणते.
अर्जुन कपूरबाबत बोलताना मलायका म्हणते,अर्जुन मला खूप चांगल्याप्रकारे समजून घेतो. आम्ही नेहमी एकमेकांना प्रोत्साहन देतो. रिलेशनशिपमध्ये असण्याची सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत जसे आहात तसे राहू शकता आणि अर्जुनसोबत देखील मी जशी आहे, तशीच राहू शकते असं स्पष्ट मत यावेळी मलायकाने व्यक्त केलं. त्यासोबतच या आधीचा तिचा पती अरबाज खानशी तिचे ऋणानुबंध आजही चांगले असल्याचे तिने यावेळी सांगितले.