औरंगाबाद -करोनानंतर दोन वर्षांनी निर्बंधमुक्त गणेशोत्सव साजरा करण्यात आला. त्यामुळे राज्यभरात अनंत चतुर्दशीचा उत्साह असून गणरायाच्या विसर्जनाला सुरुवात झाली आहे. आज आपल्या लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी भाविकांनी ठिकठिकाणी गर्दी केली आहे. विसर्जनाच्या मिरवणुकांमध्ये फक्त सर्वसामान्यच नाही, तर राजकीय नेत्यांचाही मोठ्या प्रमाणात सहभाग असल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, औरंगाबादमध्ये गणपती विसर्जनाला राजकीय नेत्यांनी हजेरी लावली आहे. मात्र यावेळी शिवसेना विरुद्ध भाजपा असं मानापमान नाट्य पाहायला मिळालं.
वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांच्या अनुपस्थित संस्थांन गणपतीची सार्वजनिक आरती करण्यात आली. त्यामुळे शिवसेनेचे आमदार तथा विरोधी पक्षनेते अंबादास यांना राग अनावर झाला.
दरवर्षी सर्वपक्षीय नेते एकत्र येऊन आरती करतात. त्यानंतर हे सर्व नेते एकत्र येऊन संस्थान गणपतीचा रथ उडतात आणि सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होती. मात्र यावेळी आरतीला भाजपचे महत्वाचे नेते उपस्थित होते. काही वेळानंतर अंबादास दानवे व चंद्रकांत खैरे आले आणि मग मानापमान नाट्याला सुरुवात झाली. यावरून अंबादास दानवे यांनी आयोजकांना शिवीगाळ केली असल्याचे सुद्धा बोलले जात आहे. त्यामुळे औरंगाबादच्या गणपती विसर्जनाची सुरवात राजकीय मानापमान नाट्याने झाल्याची पाहायला मिळाली.