मुंबई – राज्यातील शिंदे गट आणि भाजपा सरकारच्या मंत्रीमंडळाचा अखेर आज विस्तार झाला आहे. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर तब्बल ४० दिवसांनी हा विस्तार पार पडला. या शपथविधी सोहळ्यावर विधानसभा विरोधीपक्ष नेते अजित पवार नाराजी व्यक्त केली आहे.
अजित पवार म्हणाले,’शिंदे-फडणवीस सरकार स्थापन होऊन महिना उलटूनही मंत्रीमंडळ विस्तारासाठी मुहूर्त मिळत नव्हता. उशीराने झालेल्या या शपथविधीवर राष्ट्रवादी पवार यांनी आपली प्रतिक्रिया माध्यमांसमोर मांडली.’
ते पुढे म्हणाले,’उशीरा का होईना पण शपथविधी झाला आणि यातून महाराष्ट्राला मंत्रिमंडळ मिळाले. आता राज्य सरकारने लवकरात लवकर राज्यातील शेतकऱ्यांपासून इतर घटकांचे अनेक प्रश्न सोडवावे, ही मागणी पवारांनी केली. तसेच ज्यांना क्लीनचिट मिळाली नाही अशांना मंत्रिमंडळात घेतले नसते तर बर झालं असते’ असा चिमटाही अजित पवार यांनी काढला.