मुंबई – राज्यासाठी हळद संशोधन व प्रक्रिया धोरण लागू करण्याचा निर्णय बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. तसेच हिंगोली जिल्ह्यात बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन व प्रशिक्षण केंद्र स्थापन्यास मान्यता देण्यात आली आहे.
राज्यात हळद संशोधन व प्रक्रिया धोरण निश्चित करण्यासाठी स्थापन केलेल्या समितीने केलेल्या शिफारशींना तत्वत: मान्यता देण्यात आली आहे. हिंगोली जिल्ह्यामध्ये बाळासाहेब ठाकरे हरिद्रा (हळद) संशोधन व प्रशिक्षण केंद्र कंपनी कायद्यानुसार ना नफा तत्त्वावर एक स्वायत्त संस्था म्हणून स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली.
पोलिसांच्या घराला राज्य शासनाकडून सर्वोच्च प्राधान्य; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
याशिवाय राज्यात तीन नवीन समाजकार्य महाविद्यालयांनाही मान्यता देण्यात आली. उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या निर्णयानुसार धुळे जिल्ह्यातील साक्री येथील संत तुकाराम सामाजिक संस्था, उस्मानाबाद जिल्ह्यातील अश्वमेध बहुउद्देशीय शैक्षणिक व सामाजिक संस्था, जालना येथील दिशा बहुउद्देशीय सेवाभावी संस्था या तीन संस्थांना कायमस्वरुपी विनाअनुदान तत्त्वावर मान्यता आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत देण्यात आली.
“शिवसेना विरुद्ध शिवसेना असा संघर्ष भडकवण्याचा दिल्लीचा डाव”