मुंबई – बंडखोरी करत शिंदे गटाने भाजपसोबत राज्यात सत्तास्थापन केली. मात्र, आम्ही बंडखोरी केली नसून आम्ही आजूनही शिवसैनिकच आहोत, असा दावा शिंदे गटाकडून केला जात आहे. तसेच, शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या बेताल वक्तव्यांवरही शिंदे गटातील आमदार नाराज असल्याचे त्यांनी वेळोवेळी बोलून दाखवले आहे. दरम्यान, गुरुवारी खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना “महाविकास आघाडी प्रयोगानंतर संदीपान भूमरे यांना मंत्रीपद मिळाल्यानंतर त्यांनी माझी सामना ऑफिस येथे भेट घेवून, साहेब तुम्ही होता म्हणून हे सरकार आले आणि आम्ही मंत्री झालो, असे म्हणत लोटांगण घातले,” असे म्हटले होते.
या वक्तव्याचा शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसकर यांनी समाचार घेतला आहे. माध्यमांशी बोलताना, “माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आम्हाला बोलावले तर आम्ही नक्की जाऊ, त्याचा आम्हाला आनंदच आहे. मात्र, त्यापूर्वी आम्ही संवाद साधत असताना त्यांनी आधी आजूबाजूचे लोक बाहेर ठेवावेत”, अशी अपेक्षा केसकर यांनी बोलून दाखवली. तसेच, “आता आम्ही भाजपबरोबर आहोत, त्यामुळे त्यांच्याशीही संवाद साधावा लागेल,’ असेही ते म्हणाले.
संजय राऊत यांच्यावर टीका करताना केसकर म्हणाले की, “राऊत हे स्वत:ला शिवसेना पक्ष प्रमुखांच्या जवळचे समजतात. परंतु ते खरेतर राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या जवळचे आहेत. आम्ही केवळ पहिल्या दिवसापासून उद्धव साहेबांचे मन वळविण्याचा प्रयत्न करत होतो. राऊतांच्या पायावर लोटांगण घालणाऱ्यातला मी नाही. साहेबांनीही सांगवे मी कधी मंत्रीपदासाठी त्यांना म्हटले आहे”, अशीही टीका केसकर यांनी केली आहे.
‘मी कधी उत्तर देत नाही. पण तुम्ही एका महिला खासदाराला पदावरून काढता. हा सर्व महिलांचा अपमान आहे. तुम्ही त्यांना पदावरून काढता मग त्यांच्यीशी बोलता. याला अर्थ राहात नाही”, असे म्हणत केसरकर यांनी खासदार भावना गवळी यांना लोकसभा गटनेतेपदावरून काढल्याबद्दल नाराजी व्यक्त केली.
अन् खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा अपघातग्रस्त वारकऱ्यांना व्हिडीओ कॉल, म्हणाले…
दरम्यान, “संजय राऊत यांच्यासह मातोश्रीवर असलेली चांडाळचौकडी शिवसेना बुडविल्याशिवाय राहणार नाही. राऊतांच्या म्हणण्यानुसार सध्या शिवसेनेत कामकाज सुरू आहे. काही झेलकरी त्यांची पालखी वाहत आहेत. शिवसेना प्रमुखांच्या विचारांना तिलांजली दिली जात आहे. ती चांडाळचौकडी बाजूला केल्यास पक्षाचे भवितव्य आहे”, असा सल्ला शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी दिला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केला मंत्रालयातील दालनातून कामकाजाला प्रारंभ