मुंबई – महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी (७ जुलै) अधिकृतरीत्या पदभार स्वीकारला. असं असलं तरी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यापासूनच शिंदे प्रचंड ‘ऍक्टिव्ह’ झाले असल्याचे पाहायला मिळाले. मुख्यमंत्री शिंदे यांची एक कृती सध्या सर्वत्र कौतुकाचा विषय ठरत आहे. त्याचं झालं असं की, दोन वर्षांच्या खंडानंतर वारकरी पायी वारीसाठी पंढरपूरला निघाले आहेत. वारीच्या वाटेवर काही वारकऱ्यांना सांगली येथील रस्ते अपघाताला सामोरे जावे लागले.
धक्क्यावर धक्के! ठाण्यानंतर नवी मुंबईतील नगरसेवकही शिंदे गटात जाणार?
याबाबत माहिती मिळताच शिंदे यांनी स्वतः डॉक्टरांशी फोनवरून संवाद साधला. अपघातग्रस्त वारकऱ्यांवर तातडीनं उपचार करुन त्यांना जी काही मदत लागेल ती करण्याचं आश्वासन दिलं होतं. तसंच गरज पडल्यास त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते.
उद्धव ठाकरेंना एकनाथ शिंदेंचा आणखी एक धक्का; ठाण्यातील ६७ पैकी ६६ नगरसेवक शिंदे गटात
अशातच आज मुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढत अपघातग्रस्त वारकऱ्यांशी व्हिडीओ कॉलद्वारे संवाद साधला. जखमी वारकऱ्यांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची विचारपूस करण्यासाठी सांगली जिल्ह्यातील विटा येथी आमदार अनिल बाबर रुग्णालयात पोहोचले होते.
बाबर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना व्हिडिओ कॉल लावून अपघातग्रस्तांशी संवाद साधून दिला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी जखमी वारकऱ्यांची आपुलकीने विचारपूस केली आणि तब्येतीची विचारणा केली.