मुंबई : एकीकडे एकनाथ शिंदे यांनी बंड करीत राज्यसरकार अल्पमतात आल्याचा दावा केला आहे. तर दुसरीकडे शिवसेना नेते संजय राऊत यांना समन्स बजावण्यात आले आहेत. अलिबाग येथील जमीन घोटाळा प्रकरणी संजय राऊत याना ED ने समन्स बाजवले आहेत. शिवाय उद्या म्हणजेच 28 जूनला सकाळी आकरा वाजता त्यांना चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे.
या..मला अटक करा
संजय राऊत यांना ED चे समन्स मिळाल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्यांनी याबाबत ट्विट करीत सांगितले आहे. त्यांनी आपल्या ट्विट मध्ये म्हंटले आहे की, “मला आताचा समजले ED ने मला समन्स पाठवले आहे.छान.महाराष्ट्रात मोठ्या घडामोडी सुरू आहेत. आम्ही सगळे बाळासाहेबांचे शिवसैनिक मोठ्या लढाईत उतरलो आहोतमला रोखण्यासाठी..हे कारस्थान सुरू आहे.माझी मान कापली तरी मी गुहातीचा मार्ग स्विकारणार नाही.या..मला अटक करा! जय महाराष्ट्र! ” असे आव्हानात्मक ट्विट संजय राऊत यांनी केले आहे.
मला आताचा समजले ED ने मला समन्स पाठवले आहे.छान.महाराष्ट्रात मोठ्या घडामोडी सुरू आहेत. आम्ही सगळे बाळासाहेबांचे शिवसैनिक मोठ्या लढाईत उतरलो आहोतमला रोखण्यासाठी..हे कारस्थान सुरू आहे.माझी मान कापली तरी मी गुहातीचा मार्ग स्विकारणार नाही.या..मला अटक करा!
जय महाराष्ट्र!@Dev_Fadnavis pic.twitter.com/jA1QcvzP7a— Sanjay Raut (@rautsanjay61) June 27, 2022
शिंदे गटाकडून याचिका
काही वेळातच सर्वोच्च न्यायालयात यावर सुनावणी सुरु होणार आहे. मात्र त्यापूर्वी सरकार अल्पमतात आल्याचा दावा शिंदे गटाने केला आहे. आमच्याकडे एकूण 51 आमदारांचं संख्याबळ आहे. त्यात शिवसेनेचे 39 आमदार आहेत. कालपर्यंत हा आकडा 38 होता. उदय सामंत आल्याने तो 39 झाला आहे. दोन तृतियांशच्या आकड्यासाठी 37 आमदार लागतात. त्यामुळे आमच्याकडे पुरेसा आकडा आहे, असा दावा शिंदे गटाने केला आहे.