नवी दिल्ली : केंद्र सरकारकडून तिन्ही दलातील सैनिक भरतीसाठी ‘अग्निपथ’ योजना जाहीर केल्यानंतर देशात काही ठिकाणी या योजनेला कडाडून विरोध होताना दिसत आहे. खास करून बिहार आणि राजस्थानमध्ये या योजनेला विरोध होऊ लागला आहे. बिहारमध्ये लष्करात भरती होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांकडून रेल्वे स्थानकावर आंदोलन करण्यात आले. मात्र या आंदोलनाला हिंसक वळण लागले असून दगडफेक करण्यात आली.
सलग दुसऱ्या दिवशी बिहारमध्ये विद्यार्थ्यांकडून आंदोलन करण्यात येत आहे. अनेक ठिकाणी रस्ते आणि रेल्वे वाहतूक अडवण्यात आली आहे. दरम्यान, संतप्त विद्यार्थ्यांनी भभुआ रेल्वे स्थानकावर इंटरसिटी एक्र्स्प्रेस ट्रेनवर दगडफेक करत एका डब्याला आग लागली, योजनेला विरोध करणाऱ्या विद्यार्थ्यांनी हातामध्ये ‘भारतीय लष्कराचे चाहते’ असा बॅनर घेतला होता.
#WATCH | Bihar: Youth demonstrate in Chhapra, burn tyres and vandalise a bus in protest against the recently announced #AgnipathRecruitmentScheme pic.twitter.com/Ik0pYK26KY
— ANI (@ANI) June 16, 2022
विद्यार्थ्यांकडून दगडफेक होत असल्याने आंदोलक विद्यार्थ्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या सोडल्या. यासोबत विद्यार्थ्यांनी लावलेली आग विझवण्यासाठी पोलीस प्रयत्न करत असल्याचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत.
#WATCH | Bihar: Armed forces aspirants protest in Munger against #AgnipathRecruitmentScheme
A protester says “We demand that the recruitment be done as it used to be done earlier,Tour of Duty (ToD) be rolled back & exams be held as earlier. Nobody will go to Army just for 4 yrs” pic.twitter.com/b5dnSUYohW
— ANI (@ANI) June 16, 2022
दरम्यान, देशाच्या तिन्ही सैन्यदलांच्या प्रमुखांसह संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी नुकतीच अग्निपथ योजनेची घोषणा केली होती. ‘‘अग्निपथ भरती योजना हे एक क्रांतिकारी पाऊल आहे. त्यामुळे संरक्षण दलांना आणखी तरुण चेहरा प्राप्त होईल. या योजनेंतर्गत युवकांना संरक्षण दलांत चार वर्षे ‘अग्निवीर’ म्हणून सेवेची संधी मिळेल’’, असे सिंह यांनी सांगितले होते. या योजनेद्वारे भरतीमुळे व्यापक स्तरावर प्रतिभावान सैनिक संरक्षणदलांना मिळतील, असा विश्वास नौदलप्रमुख अॅडमिरल आर. हरिकुमार यांनी व्यक्त केला होता.