मुंबई – तिसऱ्या तिमाहीत म्हणजे ऑक्टोबर- नोव्हेंबर दरम्यान अखिल भारतीय घर किंमत निर्देशांक (एचपीआय) 3.1 टक्क्यांनी वाढला आहे. रिझर्व बॅंकेने जारी केलेल्या आकडेवारीत ही माहीती देण्यात आली आहे.
2010-11 मधील घरांच्या किमतीचा संदर्भ घेऊन रिझर्व बॅंक प्रत्येक तीन महिन्याला घरांच्या दरासंदर्भातील आकडेवारी जाहीर करीत असते. दहा मोठ्या शहरातील घरांच्या नोंदणीचा आकडेवारीसाठी विचार करण्यात येतो. या दहा शहरांमध्ये अहमदाबाद, बंगलोर, चेन्नई, दिल्ली, जयपूर, कानपूर, कोलकत्ता, लखनऊ आणि मुंबईचा समावेश आहे. या वर्षी दुसऱ्या तिमाहीत घरांच्या किमती 2.4 टक्क्यांनी वाढल्या होत्या.
तर गेल्या वर्षी तिसऱ्या तिमाहीत घरांच्या किमती 2.2 टक्क्यांनी वाढल्या होत्या. कोची शहरांमध्ये घरांच्या किमती 19.4 टक्क्यांनी वाढल्या आहेत तर चेन्नईमध्ये घरांच्या किमती 4.1 टक्क्यांनी कमी झाल्या आहेत. चेन्नईमध्येही घरांचे दर कमी झाले आहेत. मात्र इतर शहरांमध्ये ते वाढले आहेत. दिल्ली शहरात घरांचे दर सर्वात जास्त म्हणजे 9.5 टक्क्यांनी वाढले. ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत या दहा शहरांमध्ये घराची नोंदणी 3.2 टक्क्यांनी वाढली आहे.
महागाई वाढल्यामुळे सिमेंट, पोलाद आणि घरासाठीच्या इतर कच्च्या मालाच्या दरामध्ये गेल्या काही महिन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्याचबरोबर लॉक डाऊन संपुष्टात आल्यामुळे घरांची मागणी वाढत आहे. त्यामुळे आगामी काळात घरांच्या किमती वाढतील. त्याचबरोबर विक्रीही वाढेल असे समजले जाते. सध्या घरांच्या कर्जावरील व्याजदर कमी आहेत. पुढील काही महिन्यांमध्ये या व्याजदरात वाढ करण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.