मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात कोरोना महामारी नियंत्रणात आणण्याचे उत्कृष्ट काम झाले, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना केले.
या कामाचे कौतुक माध्यमे, न्यायालय आणि विविध संस्थांनी देखील केले आहे. मात्र राजकीय भूमिकेतून कोणी टीका करत असल्यास, देशात लोकशाही असल्यामुळे हा त्यांचा अधिकार आहे असे अजित पवार म्हणाले.
यावेळी राज्यात कोरोना काळात झालेल्या कामाचा दाखला देताना अजित पवार यांनी धारावीचा उल्लेख केला. त्याठिकाणी कोरोना नियंत्रणात आणण्याचे आव्हानात्मक काम राज्य सरकारने केले. वेळप्रसंगी धीर देऊन तर कधी कडक निर्बंध लावून परिस्थिती नियंत्रणात आणली, असे ते म्हणाले. तसेच कोरोनाचे सावट बऱ्याच अंशी दूर झाले असले तरी संपलेले नाही, असे ते म्हणाले.