नवी दिल्ली – देशभरातील अनौपचारिक क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांची नोंदणी करण्यासाठी केंद्र सरकारने ई- श्रम पोर्टल सुरू केले आहे. या पोर्टलवर आतापर्यंत तब्बल 21 कोटी कामगारांनी नोंदणी केली आहे.
आतापर्यंत या कामगारांची आकडेवारी राज्य सरकार किंवा केंद्र सरकारकडे नव्हती. त्यामुळे अडचणीच्या काळात या कामगारांना मदत करता येत नव्हती. सर्व राज्यांनी या कामगारांनी ई-श्रम पोर्टलवर नोंदणी करावी यासाठी पुढाकार घेण्याची गरज असल्याचे केंद्रीय कामगार विभाग सचिव सुनील बारथवाल यांनी सांगितले.