मुंबई – अमेरीकेतील महागाई मोठ्या प्रमाणात वाढल्यानंतर जागतीक शेअर बाजारातून नकारात्मक संदेश आले. त्यामुळे भारतीय शेअर बाजाराचे निर्देशांक अस्थिर होते. मात्र अखेरच्या सत्रात काही प्रमाणात खरेदी झाल्यामुळे निर्देशांकात काही प्रमाणात वाढ झाली. दरम्यान निर्देशांक वाढल्यामुळे आता शेअर बाजारावर नोंदलेल्या भारतातील कंपन्याचे बाजार मुल्य 277 लाख कोटी रुपयांवर गेले आहे.
बाजार बंद होतांना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 85 अंकांनी वाढून 61,235 अंकांवर बंद झाला. विस्तारीत पाया असलेल्या राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 0.25 टक्क्यानी म्हणजे 45 अंकांनी वाढून 18,257 अंकावर बंद झाला.
टाटा स्टीलचा शेअर आज सर्वाधीक म्हणजे 6 टक्क्यानी वाढला. त्याचबरोबर सन फार्मा, एल ऍण्ड टी, महिंद्रा, पावर ग्रीड, बजाज फिन्सर्व्ह, टिसीए, इन्फोसीस या कंपन्याचे शेअर वाढते. तर विप्रो, एशियन पेन्टस्, एचडीएफसी बॅंक, इंडस्इन्ड बॅंक, एचसीएल टेक् या कंपन्याना विक्रीचा मारा सहन करावा लागला.
अमेरीकेतील महागाई वाढण्याबरोबरच चीनमधील कर्ज पुरवठाकमी झाल्याची आकडेवारी जाहीर झाल्यानंतर युरोपीयन शेअर बाजाराबरोबरच आशियायी शेअर बाजाराचे निर्देशांक कमी झाले. मा भिारतातील कंपन्या चांगले ताळेबंद जाहीर करतील म्हणून भारतीय शेअर बाजारता खरेदी कामय होती. मात्र आता गुंतवणूकदार सावध राहण्याची शक्यता आहे.
दरम्यान अमेरीकेतील शक्य व्याजदर वाढीमुळे परदेशी संस्थागत गुंतवणकूदार विक्री वाढविण्याची शक्यता आहे. काल या गुंतवणूकदारांनी 1,001 कोटी रुपयाच्या शेअरची विक्री केली. आता निर्देशांकांची वाटचाल या गुंतवणूकदारांच्या भूमिकेवर अवलंबुन राहणार असल्याचे समजले जाते.