शारजा : टी-20 विश्वकरंडक स्पर्धेच्या सुपर 12 फेरीतील श्रीलंका व बांगलादेश यांच्यातील सामन्यात घडली. श्रीलंकेचा गोलंदाज लाहिरू कुमारा आणि बांगलादेशचा फलंदाज लिंटन दास यांच्यात शाब्दिक चकमक झाली होती. याची दखल आयसीसीने घेतली आहे.
आचारसंहितेचा भंग केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला व लाहिरू कुमाराच्या सामन्याच्या मानधनातून 25 तर, लिंटन दासच्या मानधनातून 15 टक्के रक्कम दंड म्हणून काढून घेतली जाणार आहे.
बांगलादेशची फलंदाजी सुरू असताना सहाव्या षटकात या दोघांमध्ये शाब्दिक चकमक उडाली होती. कुमाराने सहाव्या षटकातील पाचवा चेंडू टाकत लिंटन दासला बाद केले. तसेच त्याला उद्देशून काही वक्तव्यही केले. त्याचवेळी लिंटन दासनेही त्याला प्रत्यूत्तर दिले.