वाघोली – मनसेच्या विधी विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष ॲड.गणेश म्हस्के पाटील यांच्या नेतृत्वाखाली रस्त्या अभावी ऐन रस्त्यावरच बहिणींनी भावांना राखी बांधून रक्षाबंधन साजरे केले.
वाघोली-केसनंद रस्त्याचे काम अतिशय संथ गतीने चालू असुन वाघोली येथील जे.जे.नगरच्या लेन नं.६ समोर गेल्या महिनाभरापासून रस्त्याचे काम सुरू आहे. ठेकेदाराने लेन मध्ये गाड्या येण्या जाण्या साठी रस्ता सोडणे आवश्यक होते परंतु रस्ता न सोडल्याने तेथील रहिवाशांना गाड्या घेऊन येणे जाणे बंद झाले आहे. तसेच रस्त्या अभावी पाण्याचा टॅंकर सुध्दा आत येत नसल्याने रहिवाशांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. या भागात कोणताही अनुचित प्रकार घडला तर तातडीने मदत पोहोचवण्यात देखील अडचण येऊ शकते.रक्षाबंधन सण असल्याने भावांना तसेच बहिणींना रस्त्या अभावी ऐन रस्त्यावरच रक्षाबंधन साजरे करावे लागले.
या प्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेना जनहित चे पुणे जिल्हा उपाध्यक्ष सुनिल विटकर, तालुका अध्यक्ष हितेश बो-हाडे, सहकार सेना जिल्हा उपाध्यक्ष दत्ता व्यवहारे, वाघोलीचे अध्यक्ष मंगेश सातव,दादा रणदिवे, गणेश तापकीर, अक्षय बागल,गोरक्ष म्हस्के, सुनिल शितोळे, सुधाकर घोक्षे, विलास शिनगारे तसेच महिला व रहिवाशी उपस्थित होते.
“वाघोली केसनंद रस्त्याचे काम अतिशय संथ गतीने चालू असून वारंवार या ठिकाणी वाहतूक कोंडी सदृश्य परिस्थिती निर्माण होत असून नागरिकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. नागरिकांना ये-जा करण्यासाठी रस्ता लवकरात लवकर करण्यात यावा अन्यथा मनसेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल”
ॲड.गणेश म्हस्के पाटील
प्रदेश उपाध्यक्ष, मनसे विधी विभाग