नवी दिल्ली – राज्यसभेमध्ये बुधवारी महिला खासदारांना मारहाण झाल्याचा गंभीर आरोप विरोध पक्षांच्या नेत्यांनी केला आहे. बाहेरून आलेल्या ४० महिला व पुरुषांनी राज्यसभेमध्ये घुसून महिला खासदारांना मारहाण केली, विरोधी पक्षांच्या शिष्टमंडळाने उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंची भेट घेत या घटनेचा निषेध नोंदवला असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले.
विरोधकांकडून महिला खासदारांना मारहाण करण्यात आल्याचा आरोप करण्यात येत असतानाच आता केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी, विरोधी पक्षाच्या खासदारांनीच महिला मार्शल्सना मारहाण केली असा गंभीर आरोप केला आहे.
एका वृत्तसंकेतस्थळाशी बोलताना अनुराग ठाकूर यांनी हा आरोप केला. ते म्हणाले, “आजही राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षाला देशाच्या जनतेने नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदी निवडून दिलं असल्याचं तथ्य पचनी पडत नाही. विरोधकांच्या मागणीनुसार आम्ही कृषी कायद्यांवर चर्चा करण्यास तयार होतो. मात्र त्यांनी टेबलावर उभा राहून गोंधळ घेतला. कृषी विधेयकाच्या प्रति फाडल्या. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आलेल्या महिला मार्शल्सना धक्कबुक्की केली.”
Even today, Rahul Gandhi & Cong can’t accept that people voted for Modi Ji. On Opposition’s demand, we wanted to discuss farm issues but they climbed atop table, our Minister wanted to discuss Pegasus but they tore the bill…manhandled female marshals: Union Min Anurag Thakur pic.twitter.com/KcUugrjNtl
— ANI (@ANI) August 12, 2021
दरम्यान केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी देखील याबाबत प्रतिक्रिया दिली. “चर्चा करायची असल्यास त्यासाठी चर्चेसाठी पोषक वातावरण देखील असायला हवे. मी राहुल गांधींकडून जाणून घेऊ इच्छितो की, चर्चा नेमकी कशाबाबत आहे? काल (बुधवारी) देखील आम्ही चर्चा करण्यास तयार आहोत. चर्चा होणार असेल तर सदन सोमवार, मंगळवारपर्यंत सुरु राहू शकत मात्र हे असच सुरु ठेवल्यास ते होणार नाही. असं सांगितलं होत.”
Discussion possible in a healthy environment. I would like to know from Rahul Gandhi what’s the debate about? Y’day also we offered that if they’re ready to discuss, we can run the House till Mon,Tues, but if they continue like this, things can’t work out: Union Min Pralhad Joshi pic.twitter.com/x9ptYsq6kV
— ANI (@ANI) August 12, 2021
तत्पूर्वी, राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी १५ विरोधी पक्षांच्या नेत्यांनी विजय चौकापर्यंत मोर्चा काढला. यावेळी गांधी यांनी राज्यसभेमध्ये महिला खासदारांना मारहाण झाल्याचा गंभीर आरोप लगावला. तसेच आम्हाला सदनामध्ये बोलू दिले जात नाही, आम्ही कृषी कायदे पेगॅसस हे मुद्दे उचलले मात्र आम्हाला बोलू दिले नाही. त्यामुळे आम्ही तुमच्याशी बोलायला इथे आलो आहोत असं गांधी यांनी म्हंटलं.