नवी दिल्ली – भारत सरकारने आम्हाला काहीं खाती बंद करण्याचा आदेश दिला असला तरी सरकारचा हा आदेश भारतातील कायद्यांना धरून नाही असे ट्विटर कंपनीने म्हटले आहे. त्यामुळे आम्ही ज्या खात्यावर कारवाई केली आहे त्यातील मजकूर फक्त भारतात दिसणार नाही, पण अन्य जगात मात्र तो सर्वांना दिसू शकले असेही ट्विटरने स्पष्ट केले आहे.
आम्ही प्रसार माध्यमे, पत्रकार,कार्यकर्ते आणि राजकारणी यांच्या खात्यावर कोणतीही कारवाई केलेली नाही असेहीं ट्विटरने स्पष्ट केले आहे. सरकारने असे म्हटले होते की आम्ही माहिती घेऊनच 1178 ट्विटर खाती बंद करण्याची सूचना ट्विटर कंपनीला केली होती.
ही खाती खलिस्तानी आणि पाकिस्तान समर्थकांची खाती आहेत अशी आमची खात्री पटल्यानेच आम्ही या कारवाईची शिफारस केली आहे असेही भारत सरकारच्या माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे म्हणणे आहे.