पुणे – मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. यावर्षी मकर संक्रांतीचा उत्सव 14 जानेवारी रोजी साजरा करण्यात येणार आहे. मकर संक्रांतीला स्नान केल्यानंतर हिंदू धर्मादाय कामे करतात. यानंतर पतंग उडवण्याची स्पर्धा सुरू होते. आकाशात वेगवेगळ्या आकाराचे रंगीबेरंगी पतंग दिसतात. हे दृश्य खूप सुंदर दिसते. मकर संक्रांतीच्या दिवशी पंतंग का उडविला जातो याचा तुम्ही कधी विचार केला आहे? यामागील धार्मिक कथा जाणून घेणे रंजक ठरेल.
मकर संक्रांतीला पतंग उडवण्याची परंपरा भगवान श्रीराम यांच्या काळापासून सुरू झाली अशी धार्मिक मान्यता आहे. तामिळ ‘तंदनानरामायणा’नुसार मकर संक्रांतीच्या दिवशी श्रीरामांनी पतंग उडविला आणि तो पतंग इंद्रलोकामध्ये गेला. इंद्राच्या मुलाची जयंतच्या पत्नीला हा रंगीबेरंगी पतंग आवडला. मग तेथे प्रभू रामांनी पतंग शोधण्यासाठी हनुमानाला पाठवले. हनुमानाने इंद्रलोक गाठले आणि जयंतच्या पत्नीला पतंग परत करण्यास सांगितले, तेव्हा ती म्हणाली की भगवान श्रीरामला पाहिल्यावरच पतंग परत करेल.
हनुमान परत आले आणि त्यांनी भगवान श्रीरामांना संपूर्ण कथा सांगितली. यावर श्रीरामांनी चित्रकूटमध्ये दर्शन देण्याचे सांगितले आणि जयंतच्या पत्नीकडे हनुमान यांना परत पाठवले आणि संपूर्ण भाग ऐकल्यानंतर जयंतच्या पत्नीने पतंग परत केला. त्यानंतरच मकर संक्रांतीला पंतग उडविण्याची परंपरा सुरू झाली, जी आजपर्यंत चालू आहे.
मकर संक्रांतीचे अनेक नावे :
मकर संक्रांतीला देशात वेगवेगळ्या नावांनी संबोधले जाते. दक्षिण भारत, राजस्थानमधील पोंगल, गुजरात आणि उत्तरायण, गुजरातमधील मकर संक्रांती, विशेष पंतग उत्सव देखील साजरा केला जातो. हरियाणा आणि पंजाबमध्ये मकर संक्रांतीला माघी म्हणून ओळखले जाते आणि उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशात हा उत्सव ‘खिचडी’ म्हणून ओळखला जातो.
‘व्हिटॅमिन डी’ ची प्राप्ती :
धार्मिक विश्वासाबरोबरच याचे वैज्ञानिक कारण देखील आहे. कित्येक महिन्यांच्या थंडीनंतर सूर्याशी संपर्क जवळजवळ संपतो. ‘खिचडी’ अर्थात मकरसंक्रांतीच्या दिवशी पतंग उडण्याच्या बहाण्याखाली लोक उन्हात जास्तीत जास्त वेळ राहतात, ज्यामुळे त्यांना व्हिटॅमिन डी मिळते. पतंग उडवल्याने दृष्टीही चांगली सुधारते.
Attachments area