शिक्रापूर-वर्षभर शेतकऱ्यांना अनेक वेगवेगळ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. सध्या बाजारभाव नसल्याने शेतकऱ्यांना शेतमाल रस्त्यावर फेकून देण्याची वेळ आली आहे. बाजारभाव नसल्याने पुणे- नगर महामार्गावर कोरेगाव भीमा (ता. शिरूर) हद्दीत एका शेतकऱ्याने मुळ्याचे पिक रस्त्यालगत फेकून दिले आहे.
शिरूर तालुक्यातील शेतकरी बाजारभाव नसल्यामुळे आर्थिक संकटात सापडला आहे. अनेक ठिकाणी शेतीमालाला बाजारभाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी उभ्या पिकांत जनावरे सोडली आहेत. तर काही शेतकऱ्यांनी शेतमाल शेतातच गाडला आहे. शेतकरी महागाचे बियाणे विकत घेऊन चार पैसे मिळतील या आशेवर भाजीपाला पीके घेत आहेत. बाजारभावात नेहमीच चढ-उतार होत असतो. यामध्ये काही श्तकऱ्याला चांगला बाजारभाव मिळातो. तर काहींची पिके मातीमोल ठरली आहेत. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. तर काही शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत.
शिक्रापूर परिसरातील सर्वसामान्य शेतकरी भाजीपाला विक्रीसाठी बाजारात जातात. बाजारभावात दररोज बदल होतो. त्यामुळे शेतकरी दिवसभर जो बाजारभाव मिळेल तो पदरात पाडून घेत असतो. तर शेवटी उरलेला माल बाजारातच सोडून देऊन घरी येतो, अशी अनेक उदाहरणे तालुक्यातील बाजाराच्या ठिकाणी पहावयास मिळत आहेत.
शेतमाल बाजारात घेऊन गेल्यास काही ठिकाणी टेम्पो भाडेदेखील वसूल झाले नसल्याचे अनेक वेळा चित्र पहावयास मिळत आहे. असे असताना आता कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथे पुणे-नगर महामार्गालगत अज्ञात शेतकऱ्याने शेतमाल रस्त्याच्या कडेला टाकून दिला आहे.
या शेतमालाला मार्केटमध्ये भाव मिळाला नसल्याचे परिसरातील शेतकऱ्यांनी सांगितले. शेतकरी शेतातून चार पैशांचा फायदा होईल या आशेवर पिकांवर वेळोवेळीऔषधाची फवारणी करुन अमाप खर्च करत आहे. परंतु मातीमोलबाजारभावामुळे खर्च करावा कि नाही असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा आहे. परंतु आज ना उद्या भाव मिळेल ह्या भाबड्या आशेवर राहून उधारीने का होईना खर्च करत आहे.
कांदा, कोबी, फ्लॉवर, टोमॅटो पिकांचीदेखील अशीच अवस्था झाली आहे. कोबीला देखील एक ते दीड रूपये प्रति किलोदराने भाव मिळत आहे. खर्चही निघत नसल्याने शेतकरी उभ्या पिकांत नांगरधरत आहेत. उभ्या पिकांवर टॅक्टरचे रोटर फिरविणेही अवघड झालेआहे. त्यामुळे उधारी कशी फेडायची याची चिंता आहे. बाजारातून घरी मात्र दमडीही शिल्लक येत नाही.
सांगा पिके घ्यायची तरी कोणती
शेतकरी नवनवीन तंत्रज्ञान वापरून वेगवेगळी पिके घेत आहेत.त्यामुळे पारंपरीक शेतीपेक्षा अधिक खर्च होत आहे, मात्रशेतकऱ्यांना कुठल्याही पिकांमधून चांगले पैसे मिळत नाहीत. त्यामुळे शिरूर तालुक्यातील शेतकरी हैरैण झाला आहे. यामुळे पिके तरीघ्यायची कुठली? असा सवाल शेतकरीवर्गातून विचारला जात आहे. कारण अत्यल्प बाजारभाव हिच मुख्य समस्यानिर्माण झाली आहे.