मुंबई– शिवसेना नेते उदय सामंत यांनी भाजप नेते नारायण राणे यांच्यावर जोरदार प्रहार केला आहे. नारायण राणे टिका करतात तेव्हा तेव्हा आमची मते वाढतात असा टोला सामंतांनी लगावलाय. काल साधू हत्याकांडप्रकरणी आमदार राम कदम यांना अटक केल्यानंतर नारायण राणे यांनी शिवसेनेवर बोचरी टीका केली होती.
शिवसेनेने हिंदुत्व सोडले असून शिवसेनेचा हिंदुत्वाशी काहीही संबंध नाही अशी टीका भाजपचे खासदार असलेल्या नारायण राणे यांनी केली होती. त्यावर उदय सामंत यांनी राणे यांच्यावर पलटवार केला. राणे जेव्हा आमच्यावर टीका करतात तेव्हा आमची मतं वाढतात असे सामंत म्हणाले.