मुंबई – दिवाळी पाडव्याच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी जनतेला दिवाळीच्या शुभेच्छा देतानाच, शिंदे – फडणवीस सरकारने सत्तेत आल्यापासून घेतलेल्या निर्णयांचा आढावा जनतेसमोर मांडला. हे सरकार सामान्यांप्रती कटिबद्ध असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. मुख्यमंत्र्यांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे…
७५ वर्षांवरील ज्येष्ठांना मोफत एसटी प्रवास
“स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त राज्यातील पंच्याहत्तर वर्षावरील जेष्ठांना आपण मोफत ST bus प्रवासाची योजना सुरू केली. आता बघा गेल्या बावन्न दिवसामध्ये या योजनेचा एक कोटीपेक्षा अधिक जेष्ठांनी लाभ घेतला. इतका उत्स्फूर्त प्रतिसाद या योजनेतनं मिळतोय.” असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
१०० रुपयांमध्ये आनंद शिधा
“दिवाळीसाठी शिधापत्रिका धारकांना शिधा वस्तूंचं दिवाळी गोड होण्यासाठी ‘आनंद शिधा’ केवळ शंभर रुपयामध्ये देण्याचा निर्णय घेतला.” असेही त्यांनी सांगितले.
तीस लाख शेतकऱ्यांना चार हजार कोटींची मदत
“अतिवृष्टी आणि पूरग्रस्तांना NDRFच्या मदतीच्या दुप्पट आणि दोन हेक्टर ऐवजी तीन हेक्टर मर्यादेमध्ये नुकसान भरपाई देण्याचा देखील आम्ही निर्णय घेतला. त्यामध्ये जवळपास तीस लाख शेतकऱ्यांना चार हजार कोटींची मदत मिळती आहे.” अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
निकषामध्ये न बसणाऱ्या शेतकऱ्यांसाठी नऊशे पन्नास कोटी
“निकषामध्ये न बसणाऱ्या सततच्या पावसाळ्यामध्ये बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांना देखील मोठा दिलासा देण्याचा निर्णय आम्ही घेतला. सातशे पंचावन्न कोटी रुपयांची त्यांना देखील मदत याठिकाणी सुरू आहे.भूविकास बँकेचं कर्ज घेतलेलं सुमारे पस्तीस हजार शेतकऱ्यांना नऊशे पन्नास कोटींची कर्जमाफी देण्याचा ऐतिहासिक निर्णय देखील आम्ही घेतला.” अशी माहिती त्यांनी दिली.
नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार
पुढे बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी, “पन्नास हजार रुपये जे नियमित कर्ज भरणारे शेतकरी होते त्यांना प्रोत्साहनपर अनुदान देण्याच्या योजनेत एकाच दिवशी सात लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अडीच हजार कोटी रुपये जमा करण्याचा ऐतिहासिक निर्णय झाला.” असे सांगितले.
वीस हजार पोलीस शिपायांची पदं भरण्याची प्रक्रिया सुरू
“पोलीस भरतीला देखील आम्ही सुरूवात केली आहे. वीस हजार police शिपायांची पदं भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्याचबरोबर राज्यात विविध विभागातील पंच्याहत्तर हजार पदांची भरती लवकरच सुरू करण्याचं देखील प्रक्रिया सुरू झालेली आहे. पोलिसांच्या घरांच्या किंमती पन्नास लाखावरून पंधरा लाखांवर आणल्या.” अशीही माहिती त्यांनी दिली.
प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय
“प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याचा निर्णय घेतलाय. आरोग्यासाठी देखील दुप्पट निधी देण्याचं देखील सरकार आमचं निर्णय घेतंय. राज्यात सातशे बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू आपण करतोय.”
“माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियानात चार कोटी महिलांची आरोग्य तपासणी याठिकाणी सुरू आहे. यासाठी वाहतूक आणि औषध खर्चापोटी प्रत्येक जिल्ह्याला दोन कोटी रुपये देण्याचा आपल्या सरकारने घेतलाय.” असं त्यांनी सांगितलं.
बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचा लवकरच शुभारंभ
“हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचा पहिला टप्पा नागपूर ते शिर्डी लवकरच त्याचा शुभारंभ आपण करतोय. पश्चिम महाराष्ट्र ते गोवा असा नवा economical corridor विकसित आपण करतोय. मुंबईतल्या MMRDच्या प्रकल्पांना गती देण्यासाठी साठ हजार कोटी रुपयांचं कर्ज उभारण्यास आपण त्याला परवानगी दिलेली आहे. मुंबईमध्ये तीनशे सदतीस किलोमीटरचं मेट्रोचं जाळं उभं होतंय. त्यामुळे वाहतूक कोंडी दूर होईल. लोकांना मोठा दिलासा मिळेल.”
राज्यामध्ये मित्र
“राज्यात केंद्राच्या नीती आयोगाप्रमाणे राज्यामध्ये मित्र ही संस्था आपण स्थापन केली आहे. यामुळे राज्याचा विकास वेगाने होईल. पायाभूत सुविधांच्या महत्वाच्या प्रकल्पांना देखील वेग देण्यासाठी मुख्यमंत्री वॉर रूममधून त्याचं मॉनिटरिंग केलं जातंय. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, MMRमध्ये वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी इतर आवश्यक पायाभूत सुविधांना वेग देण्याचा देखील निर्णय घेतलाय. मुंबईतल्या जवळपास सहाशे kilometreचे रस्ते आपण concrete करण्याचा निर्णय घेतला. त्याच्या निविदा प्रक्रिया देखील सुरू झालेल्या आहेत. त्याला साडेपाच हजार कोटी रुपयाची तरतूद केलीय.”
राज्यामध्ये पंधरा हजार विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी
“राज्यामध्ये पंधरा हजार विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी देण्यासाठी tata institute of social sciences सोबत देखील आपण केला आहे. महाराष्ट्रात logistic park देखील उभारण्याचा निर्णय घेतलाय. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये यशस्वी खेळाडूंना बक्षिसांच्या रकमेमध्ये पाचपट वाढ करण्याचा निर्णय घेतला यामुळे राज्यातले खेळाडू राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्या राज्याचं नावलौकिक करतील. आता सगळ्या आघाड्यांवर असा विकास कामाचा धडाका सुरू आहे. कुठलंही काम आम्ही थांबवलं नाही. उलट वित्तीय बाबींचा पडताळा ताळमेळ घेतल्यावर अनेक कामांना परवानगी तात्काळ दिली. कृषी, सिंचन, पायाभूत सुविधा, उद्योग, पर्यटन, आरोग्य आणि शिक्षण अशा बहुतेक सर्व क्षेत्रातील कामांना आम्ही गती देतोय. विकास कामं, योजना, प्रकल्प यामध्ये सर्वसामान्यांच्या आशा, आकांक्षा यांचा प्रतिबिंब उमटेल. यावर आमचा भर आहे.”
“महाराष्ट्र देशाचं ग्रोथ इंजिन आहे. आपली मुंबई, महानगरी, देशाची आर्थिक राजधानी आहे. विदेशी गुंतवणूक आणि व्यापार उद्योग, पायाभूत सुविधांच्या विकासात आपला महाराष्ट्र अग्रेसर आहे. तो देशाच्या विकासाची पताका जगात फडकवत ठेवेल. हीच आपल्या सर्वांसोबत आमची भावना आहे.”
“आणि यासाठीच आम्ही सर्वांनी एकजूट केली आहे. त्याला आपण साथ देत आहातच. ही साथ कायम राहील. हे नातं आणखी घट्ट आणि बळकट होईल असा विश्वास आहे.”
“जनतेच्या मनातलं सरकार म्हणजे त्यांचे प्रश्न, अडीअडचणी आणि भावना समजून घेऊन पुढे जाणारं सरकार अशी आमची धारणा आहे. त्यासाठी अहोरात्र काम करण्याची जनतेत जाऊन त्यांना सोबत घेऊन काम करण्याची आमची तयारी गेल्या काही दिवसापासून आपण हे बदल अनुभवत असालच. हा केवळ एक टप्पा आहे. आमच्या सरकारला अजून मोठी गाठायची आहे. आपल्याशी संवाद साधण्याचा आपल्या समोर विचार ठेवण्यासाठी दिवाळी एक संधी ठरली इतकंच.” असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
“पुन्हा एकदा आपल्या सर्वांना निरामय आरोग्य लाभावं आणि सगळ्यांच्याच आयुष्यात दीपोत्सवाचं हे पर्व आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करणारे क्षण घेऊन येवो अशा माझ्या आणि माझ्या कुटुंबीयांतर्फे हृदयपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभ दीपावली धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र!” अशा शुभेच्छा मुख्यमंत्री शिंदे यांनी राज्यातील जनतेला दिल्या.