नवी दिल्ली – देशभरात 58 लाख लोकांना उच्च रक्तदाबाचा त्रास (high blood pressure in India) असून या रुग्णांसाठी औषध उपलब्ध करून देणे हे एक मोठे आव्हान आहे, असे जागतिक आरोग्य संघटनेने (World Health Organization) म्हटले आहे. उच्च रक्त दाबाचा त्रास असलेले सर्वजण जून 2023 मध्ये सुरू करण्यात आलेल्या “इंडियन हायपरटेन्शन कंट्रोल इनिशिएटिव्ह’ अंतर्गत उपचार घेत असल्याचेही संघटनेने म्हटले आहे.
उच्च रक्तदाब व्यवस्थापन आणि नियंत्रणाचा गट अधिक बळकट करण्यासाठी 2025 पर्यंत असंसर्गजन्य रोगांपासून अकाली मृत्यूचे प्रमाण 25 टक्क्यांनी कमी करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी “आयएचसीआय’ प्रयत्नशील आहे.
त्यासाठीच हा उपक्रम 2017 मध्ये सुरू करण्यात आला आणि त्यात आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद, राज्य सरकारे आणि डब्लूएचओ-भारत यांचा समावेश आहे. औषधांच्या पुरेशा उपलब्धतेमुळे, 18 हजाराहून अधिक आयुष्मान भारत हेल्थ अँड वेलनेस सेंटर्समध्ये सुधारित काळजी घेण्याच्या कार्यक्रमांचे विकेंद्रीत आयोजन करणे शक्य झाले, असे अहवालात मान्य करण्यात आले आहे.