नवी दिल्ली – देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येमध्ये गेल्या २४ तासांमध्ये ३९०० रुग्णांची वाढ झाली असून या कालावधीत १९५ जणांना कोरोनामुळे आपले प्राण गमवावे लागले आहेत. गेल्या २४ तासांमध्ये वाढलेल्या रुग्णांमुळे देशातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा आता ४६,४३३ वर जाऊन पोहोचलाय.
देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये होत असलेली वाढ चिंता वाढवणारी असली तरी कोरोना रुग्ण बरे होण्याचा टक्का टक्का देखील वधारला आहे. देशातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सध्या २७.४१ टक्के इतके असून गेल्या २४ तासात १०९५ जण कोरोनामुक्त झाले आहेत.
कोरोना विषाणूच्या प्रसारास अटकाव करण्यासाठी देशभरामध्ये लॉक डाऊनचा तिसरा टप्पा लागू करण्यात आला आहे. असं असलं तरी लोक सध्या मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरताना दिसत असून एकीकडे कोरोना रुग्णांची वाढती संख्या तर दुसरीकडे गर्दीने फुललेले रस्ते चिंता वाढवणारे ठरत आहेत.