नवी दिल्ली – भारतीय रेल्वेने नॅशनल ट्रेन इन्क्वायरी सिस्टमच्या वेबसाइटवर रद्द केलेल्या गाड्यांची यादी प्रसिद्ध केली आहे. धुके आणि धुराच्या साम्राज्यामुळे गाड्या रद्द करण्याची प्रक्रिया वाढतच चालली आहे. एकाच वेळेस एवढ्या गाड्या रद्द झाल्यामुळे देशभरातील प्रवाशांना मोठ्या प्रमाणात अडचणींना सामोरे जावे लागू शकते.
देशात थंडीचा कडाका वाढू लागला आहे. थंडीमुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. धुक्यामुळे गाड्या रद्द करण्याची प्रक्रिया वाढत आहे. दिल्ली आणि मुंबई मार्गावर धावणाऱ्या अनेक गाड्या उशिराने धावत आहेत. त्याचवेळी रेल्वेला अनेक गाड्या रद्द कराव्या लागल्या. देशभरात रेल्वेच्या वेगवेगळ्या झोनमध्ये सुरू असलेली दुरुस्ती आणि धुक्यामुळे इतक्या गाड्या न चालवण्याचा निर्णय भारतीय रेल्वेने घेतला आहे.
भारतीय रेल्वेने सोमवारी 252 गाड्या रद्द केल्या आहेत. त्याच वेळी, 29 गाड्या अंशतः रद्द करण्यात आल्या आहेत. तर 29 गाड्यांचे वेळापत्रक बदलण्यात आले आहे. याशिवाय आज 22 गाड्यांचे मार्ग रेल्वेने वळवले आहेत. इतक्या गाड्या रद्द झाल्यामुळे देशभरातील प्रवाशांना मोठ्या प्रमाणात अडचणींना सामोरे जावे लागू शकते.
या राज्यांतील प्रवाशांना बसणार फटका –
महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, हरियाणा, नवी दिल्ली, पंजाब, आसाम, कर्नाटक, झारखंड, छत्तीसगड आणि बिहार या राज्यांसह अनेक राज्ये रद्द आणि ट्रेनच्या वेळापत्रकातील इतर बदलांमुळे प्रभावित होतील. त्यामुळे राज्य शासनाच्या वाहतूकम् सेवेवर ताण येत असून खासगी वाहतूकदारांची मनमानी सुरु झाल्याचेही चित्र आहे.