नवी दिल्ली : “कोविड -19′ च्या पार्श्वभूमीवर उद्भवणाऱ्या समस्यांच्या पार्श्वभूमीवर श्रम आणि रोजगार मंत्रालयाने संपूर्ण देशभरात मुख्य कामगार आयुक्तांतर्गत, 20 नियंत्रण कक्षांची स्थापना केली आहे.
मध्यवर्ती क्षेत्रात कार्यरत कामगारांच्या वेतनाशी संबंधित तक्रारी दूर करणे, विविध राज्य सरकारांशी समन्वय साधून स्थलांतरित कामगारांच्या अडचणी दूर करणे, हे या नियंत्रण कक्षांचे प्रमुख काम असणार आहे. कामगारांना फोन नंबर, व्हॉट्स अप आणि ईमेलद्वारे या नियंत्रण कक्षांशी संपर्क करता येतो. सर्व 20 नियंत्रण कक्षांच्या कामकाजावर मुख्यालयाचे मुख्य कामगार आयुक्त दररोज देखरेख करतात.
सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी पीडित कामगारांना जास्तीत जास्त मदत करण्यासाठी मानवी दृष्टिकोन अवलंबावा आणि गरजूना वेळेवर शक्य ती मदत पोहचवण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.