मुंबई- भारतीय शेअर बाजाराचे निर्देशांक सध्या बऱ्याच खालच्या पातळीवर असल्यामुळे दिर्घ पल्ल्याचा विचार करणाऱ्यानी आज बरीच निवडक खरेदी केली. त्यामुळे जागतीक बाजारातील वातावरण खराब असतानाही भारतीय शेअर बाजाराचे निर्देशांक 3 टक्क्यानी वाढले. एचडीएफसी आणि रिलायन्स इंडस्ट्रीजने आजच्या तेजीचे नेतृत्व केले.
बाजार बंद होतांना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 622 अंकानी म्हणजे 2.06 टक्क्यानी वाढून 30,818 अंकावर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 187 अंकानी म्हणजे 2.11 टक्क्यानी वाढून 9,066 अंकावर बंद झाला. एचडीएफसीचा शेअर आज तब्बल 5 टक्क्यानी वाढला. महिंद्रा, एल ऍण्ड टी, टाटा स्टील, बजाज फायनान्स, सन फार्मा या कंपन्याचे शेअरही आज वाढले.
मात्र इंडसइंड बॅंक, हिरो मोटो कॉर्प, भारती एअर टेल, एशियन पेंटस् या कंपन्याना विक्रीचा मारा सहन करावा लागला. करोनामुळे भारताबरोबरच जगाची अवस्था फारच बीकय झाली असल्यामुळे आगामी काळात निर्देशांकाना प्रदिर्घ काळ अनिश्चिततेचा सामना करावा लागणार आहे. करोनामुळ भारतीाल मृतांची संख्या 3,303 तर संसर्ग झालेल्याची संख्या 1.06 लाख झाली आहे. जागतीक पातळीवर बाधीतांची संख्या 48.97 लाख तर मृतांची संख्या 3.23 लाखावर गेली आहे.
जागतीक बाजारात आज क्रुडचे दर 1.2 टक्क्यानी वाढून 35 डॉलर प्रती पिंपावर गेले. मात्र रुपयाच्या मुल्यावर आज 14 पैशांचा परिणाम होऊन रुपयाचे मुल्य 75.80 रुपये प्रती डॉलर या पातळीपर्यंत खाली आले.