श्रीनगर: नागरिकत्व दुरुस्ती कायद्यानंतर देशातील विविध भागातील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर इंटरनेट बंद करण्यात आले होते, तर जम्मू-काश्मीर आणि लडाखच्या काही भागात 145 दिवसांपासून असलेली इंटरनेट बंदी हटविण्यात आली आहे. ताज्या माहितीनुसार जम्मू-काश्मीर राज्यापासून विभक्त झाल्यानंतर केंद्रशासित प्रदेश ठरलेल्या लडाखच्या कारगिल आणि द्रासमध्ये इंटरनेट सेवा सुरु करण्यात आली आहे.
कलम 370 काढून टाकल्यानंतर इंटरनेट आणली होती बंदी
महत्त्वाचे म्हणजे 5 ऑगस्ट रोजी जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटविल्यानंतर, जम्मू-काश्मीरमधून राज्याचा दर्जा मागे घेण्यात आला आणि लडाखसह त्याला केंद्र शासित प्रदेश बनविण्यात आले. या क्षेत्राला कलम 370 अंतर्गत विशेष अधिकार देण्यात आले होते, जो मागे घेण्यात आला. अशा परिस्थितीत कोणत्याही अनुचित घटनेची शक्यता रोखण्यासाठी इंटरनेटवर बंदी घालण्यात आली होती.
सध्या काश्मीरमध्ये नाही आहे इंटरनेट
मोबाइल आणि ब्रॉडबँड सेवा यापूर्वीच लडाखमध्ये अस्तित्वात आहेत आणि आता इंटरनेट देखील सुरू केली गेली आहे. एका वृत्तवाहिनीच्या म्हणण्यानुसार, कारगिलमधील शांततामय परिस्थितीमुळे इंटरनेट सेवा सुरू करण्यात आल्याची माहिती सरकारी सूत्रांकडून मिळाली आहे. त्याचबरोबर जम्मू-काश्मीरमध्ये इंटरनेट सेवा नाही पण तिथे तैनात असलेल्या केंद्रीय सैन्याला परत बोलावण्यात येत आहे.